दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:देगलूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांनी पदभार स्वीकारताच आपल्या कार्याची चुणूक दाखवत नियमबाह्य कामे, अवैध धंदे यासह वाळू माफियांवर कारवाईचा बडगा उगारत
प्रशासकीय यंत्रणेला अलर्ट मोडवर आणले होते. मात्र अधिकारी कितीही मोठा असला, तरी स्थानिक प्रशासनातील कर्मचाऱ्यांची साथ न मिळाल्यास एकट्या सहाय्यक जिल्हाधिकारी काय करू शकतात? याचा प्रत्यय खानापूर फाटा व अंतापूर येथे कार्यरत असलेल्या बैठे पथकाच्या कामगिरीकडे पाहिल्यास लक्षात येते. या पथकाकडून नियमबाह्य चालणाऱ्या किती वाळू वाहनांवर कारवाई करण्यात आली? याची चौकशी केल्यास खरे चित्र स्पष्ट होईल. सोबतच तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन व आरटीओ विभाग यांच्याकडूनसुद्धा, म्हणावी तशी साथ मिळत नसल्याने. कारवाईबाबत मॅडम सध्या एकाकी पडल्याचे व मॅडम आज कुठे आहेत? कुठे जाणार आहेत? कधी येणार आहेत? याची संपूर्ण माहिती कर्मचारीच वाळूमाफियांना पुरवीत असल्याची कुजबुज नागरिकांमध्ये होताना दिसून येत आहे..