दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी:माधव गोटमवाड
नांदेड:-
मागील काही वर्षापासुन लाभार्थ्याच्या स्थलांतर व काहींचे मृत्यु व काही लाभार्थ्याचे तांत्रिक अडचण दाखवुन तसेच त्यांच्या खात्यातुन पैसे काढणे असे प्रकार सुरु आहेत. काही लाभार्थी मयत असतांना सुध्दा त्यांच्या खात्यात पैसे टाकुन नंतर परत करणे पुन्हा आधार विषयक तांत्रिक अडचण दाखवुन ती रक्कम बेरर चेक द्वारे वटवणे असे प्रकार होत आहेत. असे चंद्रकांत गोंविद कटकमोड, रा बळीरामपुर ता. जि. नांदेड यांनी सांगितले.त्यांनी असेही म्हटले आहे की तीन वेळेस विनंती अर्ज केला त्यावर लेखी किंवा तोंडी कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळालेले नाही संबंधीत आपल्या कार्यालयाशी संजय गांधी निराधार योजनेच्या जिल्हा तहसिलदार यांच्याशी भेटलो असता तुमचा तक्रारी अर्ज तहसिल कार्यालयास पाठविला आहे आणि आमच्याकडे काहीही संबंध नाही असे उडवा-उडवीचे उत्तर देत आहेत..तरी या सर्व प्रकारामध्ये आपल्या अधिनस्त कार्यालयातील अधिकारी कनिष्ठ कर्मचारी बँकेतील अधिकारी यांचा सहभाग आहे. तरी होत असलेल्या गैरप्रकारांची
सखोल चौकशी करून योग्य ते लाभार्थ्यांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे .