दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका-मनिषा भालेराव
वाडा नगरपंचायत स्थापन होऊन ५ वर्षाचा कालावधी पुर्ण होत आला असला तरी नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. नगरपंचायत क्षेत्रातील एकाही
गरजूंना घरकुलयोजनेचा लाभ मिळालेला नसल्याचे निवेदनात नमूद केले असून, अंतर्गत अपूर्णरस्ते, दिवाबत्ती, पाणी पुरवठा अशा सुविधांचा अभाव आहे. तर सिद्धेश्वरी रोड – आंबिस्ते पाडा – विसर्जन घाट रस्त्याची खुपच बिकट परिस्थिती झाली आहे. हा रस्ता चालण्यासही योग्य नाही हाच रस्ता स्मशानभूमीकडे जात असल्याने अंत्यविधी साठी दुसऱ्या गावातील स्मशानभूमीत जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. तरी हा रस्ता तातडीने दुरुस्ती करावा यासाठी निवेदन नगरपंचायत कार्यालयात सादर केले आहे.