दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका-मनिषा भालेराव
आज (दि 4/8/2022 )रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त कृषी व मनरेगा विभाग जिल्हा परिषद पालघर व टाटा मोटर्स व बायफ संस्था यांच्या संयुक्त विदयमाने पालघर जिल्ह्यातील वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा या तालु्क्यामध्ये 5लाख वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहे .यातून सुमारे 1800शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळणार आहे . शेतकऱ्यांनी लागवडिस खोदलेल्या खरड्या मद्ये 1एकर जमिनीत लागवडी साठी 270 फळरोप यात आंबा काजू चिकू जांभूळ लिंबू पेरू कडीपत्ता साग बांबू या फळ झाडांची जातिवंत कलमे व रोपे लाभार्थ्याना पुरविण्यात आली आहेत .झाडांपासून त्यांना पुढे आपल्या कुटुंबासाठी उदर निर्वाहाचे शास्वत स्रोत तयार होणार आहे. व पर्यावरण समतोल राखण्यासाठी मोलाची साथ मिळणार आहे .अश्या या उपक्रमाचा शुभारंभ मा. श्री सिद्धराम सालीमठ सर मुख्य कार्यकारी अधिकारी , श्री तुषार माळी सर प्रकल्प संचालक , सूरज जगताप सर ,जिल्हा परिषद पालघर तसेच गटविकास अधिकारी समीर वाठरकर जव्हार , राजेंद्र खताड वाडा, हनुमंतराव दोडके विक्रमगड , बोडके सर मोखाडा व सबंधित कृषी अधिकारी शिंदे ठाकरे ,दुमडा सर व ग्रामसेवक पंचायत समिती विभाग , सबंधित तालुक्यातील जिल्हा परिषद सभापती व पंचायत समितीचे सभापती उपसभापती यामध्ये अरुण ठाकरे , अक्षता चौधरी , रघुनाथ माळी , सागर ठाकरे योगश गवा ग्रामपंचायत सदस्य सरपंच ,तसेच टाटा मोटर्स चे सोमनाथ सोनावणे , शेलेश व बायफ चे श्री ऋतुराज सिंग ,गोरक्ष भोर , प्रदीप भोये नचिकेत संदीप ,अभाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच या उपक्रमाच राबवण्या करीता चालणा देणारे टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख श्री विनोद कुलकर्णी सर यांचे श्री सिद्धराम सालीमठ सर मुख्य कार्यकारी अधिकारी व तुषार माळी सर यांनी विशेष आभार मानले.