दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर( प्रतिनिधी)-आज दि.१४/०८/२२ रोजी विद्यालयात नेतृत्व गुण विकास शिबीर घेण्यात आले.
या शिबिरात एकूण पाच सत्रांचे नियोजन करण्यात आले होते.
पहिले सत्र- उदघाटन.
या सत्राचा विषय- अखंड भारत व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असून वक्ते स्थानिक उपाध्यक्ष गिरीश वझलवार होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भा.शि.प्र. संस्थेचे केंद्रिय अध्यक्ष मा.सुरेंद्रभाऊ आलूरकर, स्थानिक कार्यवाह प्रकाश चितांवार, स्थानिक, माध्यमिक विद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष संजय पाटील, मुख्यध्यापक माध्यमिक कोपले सर यांची उपस्थिती लाभली . मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलित करून कार्यक्रम सुरुवात करण्यात आले.
या सत्राचे वक्ते गिरीश वझलवार यांनी मुलांना मार्गदर्शन केले की,दि १४ ऑगस्टला अखंड असलेला आपला भारत देश १५ऑगस्टला खंडीत झाला. हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून मिळवावे लागले याची खंत त्यांनी व्यक्त केले.तसेच ९० वर्षांपूर्वी अखंड असलेला भारत ७ प्रांतापासून केवळ आपल्या दुर्लक्षपणामूळे दूर झाला असला तरी दरवर्षी आपण तो पुन्हा अखंडीत करु असा संकल्प केला पाहिजे.असे विद्यार्थ्यांना याप्रसंगी सांगितले.
यानंतर डॉ.आलूरकर भाऊ यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना नेतृत्व म्हणजे,केवळ दिलेल्या आज्ञेचे पालन करणे नसून स्वतः च्या जबाबदारीची जाणीव असणे तसेच आपल्यात असलेल्या सुप्त गुणांचा विकास करणे आवश्यक असते असे सांगितले व शिबिरासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिले .या सत्राचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दमन देगांवकर,आभार जाधव सचिन व सुत्रसंचलन सविता बेजगमवार यांनी केले.
सत्र दुसरे- उदबोधन
विषय- विद्यासभा व पंचकोश विकसन.
यासत्राचे अध्यक्ष म्हणून प्राथमिक विद्यालयाच्या शालेय समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई अटकळीकर व वक्ते म्हणून सुरेश कुलकर्णी प्र. पाहुणे स्वप्ना रेखावार यांची उपस्थिती होती. कुलकर्णी सुरेश यांनी सुरूवातीला मुलांना शिक्षणाच्या व्याख्या सांगितले .ज्यात मा.गांधी,स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, डॉ.आंबेडकर यांचे विचार व्यक्त केले.यानंतर पंचकोश विकसनातील अन्नमय कोश,ज्ञानमय कोश,प्राणमय कोश,विज्ञानमय कोश,मनोमय कोश याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली.तसेच विद्यासभेची ओळख व महत्व सांगितले.या सत्राचे सुत्रसंचलन विद्यार्थ्यिनी कु.राजश्री पाटील व आभार चि.वीर दस्तके यांनी मांडले.
सत्र तिसरे-खेळ
याप्रसंगी गंगाकुमार कळसकर व सुदर्शन रघोजीवार यांची उपस्थिती लाभली.सरांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांचे गट करून विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.
सत्र चौथे-आयामश: बैठक
या सत्रात विद्यार्थ्यांचे मंडळानूसार गट रचना करून विद्यार्थ्यांना मंडळाविषयी माहिती तसेच वर्षभरातील मंडळातंर्गत घेतले जाणारे उपक्रम व कार्यक्रम सांगण्यात आले.तसेच कार्यक्रमाचे आयोजन प्रत्यक्षपणे घेण्यासाठी नियोजन कसे करावे व कार्यक्रम नेतृत्व कसे करावे याचे प्रात्यक्षिक सादरीकरण करून घेण्यात आले.
सत्र पाचवे-समारोप
विषय- नेतृत्व गुण विकास या सत्रासाठी वक्ते म्हणून सिद्धार्थभाऊ आलूरकर,अध्यक्ष म्हणून दमन देगांवकर उपस्थित होते.ज्या विषयावर आधारित शिबीराचे आयोजन करण्यात आले तो विषय साध्य होण्यासाठी वक्त्यांच्या मार्गदर्शनातून मुलांचे नेतृत्व दृढ करण्यात आले. वक्त्यांनी मुलांना सांगितले की, मोठी व्यक्ती होण्यासाठी ज्ञानाबरोबर व्यक्ती छोट्या- छोट्या गोष्टी करून स्वावलंबी बनला पाहिजे तरच व्यक्ती खऱ्या अर्थाने ज्ञानी होतो असे सांगितले. देगांवकर दमन हे मुलांच्या नेतृत्वाचे कौतुक केले व यात यापूढेही पूर्ण सहभाग विद्यार्थ्यांनी नोंदवावे यासाठी शुभेच्छा दिल्या.या सत्राचे सुत्रसंचलन कु.वरेण्या आचार्य व आभार कु.गंगोत्री बोगुलवार हिने सादर केले .
या कार्यक्रमाचे शिबीरगीत अभ्यासपूरक मंडळ प्रमुख तोटावार सुरेखा यांनी सादर केले. सुरशेटवार अर्चना ,स्मिता कुलकर्णी, भानुदास शेळके,रुपा पांचारे, अश्विनी कदम,शिल्पा मजगे,स्वाती पांचाळ या सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून संपन्न झाले .