दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर:दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देगलूर तालुक्यातील मौजे केदारकुंठा येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आप्पाराव पाटील हे होते तर या जयंतीचे सूत्रसंचालन अंतेश्वर गंगाराम वाघमारे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी उत्कृष्ट पद्धतीने सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भास्करराव पाटील (सेवा सोसायटी चेअरमन करडखेड), मल्लिकार्जुन मुंडकर (तंटामुक्ती अध्यक्ष) ,पार्वतीबाई स्वामी सरपंच ,कलदुर्गे सर ,ग्रामसेवक फनताडे मॅडम ,बस्वराज खपराळे, माधव पाटील, कॉ. ईश्वर तलवारे , कॉ.गंगाधर भुयारे , कॉ. शंकर गायकवाड , कॉ. इर्शाद भाई हे उपस्थित होते, यावेळी सकाळी ठीक दहा वाजून तीस मिनिटांनी अण्णाभाऊ साठे लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार टाकून वंदन करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला व नंतर आलेल्या पाहुणेमंडळी यथोचीत सन्मान व सत्कार करून चिमुकल्यांची ओमसाई गायकवाड , वाघमारे संदेश , दत्ता वाघमारे, व इतर लोकांची भाषणे घेण्यात आली. आप्पाराव पाटील हे भाषणामध्ये तरुणांना व्येसन मुक्तीचा संदेश दिला, तसेच रामराव वाघमारे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेत पाठवा असे पालकांना विनंती केली तसेच काँ.गंगाधर भुयारे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्र या विषयावर तसेच कथा ,कादंबऱ्या “तीन भाकरीची कथा” याचे थोडक्यात पण विस्तृतवर्णन करून उपस्थितांसमोर मांडले यावेळी उपस्थितांचे आभार ॲड.सिद्धेश्वर जी.वाघमारे यांनी मानले. नंतर अण्णाभाऊ साठे यांची गावामध्ये मिरवणूक गुलालाचा वापर न करता फुलांचा वर्षाव करून मोठ्या उत्साहात हलगी व ढोल – ताशाच्या गजरात व लेझीम पथकाच्या तालावर सर्व महापुरुषांचे नावाचे जय-जयकार करत मिरवणूक पार पाडण्यात आली त्यावेळी मिरवणुकीमध्ये बीट जमादार ‘माधव पल्लेवाड’ साहेबांच्या उपस्थितीत लहान थोर मंडळी आणि महिला खूप मोठ्या प्रमाणात होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण वाघमारे ,शंकर ,वैजनाथ ,मारोती मोगलाजी वाघमारे ( माजी उपसपंच) ,माधव ,सिद्धेश्वर ,ज्ञानेश्वर ,मोगलाजी ,देविदास, दीपक ,राजू ,सुनील , बस्वराज ,राहुल ,प्रकाश , हणमंत ,नवनाथ ,संदीप, रामजी ,गंगाधर ,ईश्वर ,माधव भोसले आदींनी मेहनत घेतली..