दैनिक चालु वार्ता उपसंपादक औरंगाबाद-मोहन आखाडे
औरंगाबादला सुरु असलेल्या अग्निवीर सैन्य भरतीदरम्यान मैदानातच एक तरुण चक्कर येऊन कोसळला, आणि घाटीत उपचारा दरम्यान त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कन्नड तालुक्यामधील विठ्ठलवाडी येथील तरुण नामे करण नामदेव पवार (वय 20 वर्षे) हा अग्निवीर योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी औरंगाबादला आला होता.
काल रात्री 1 वाजता 1600 मिटर रानींग मधला अखेरचा ग्राऊंड काढत असतांना त्याला चक्कर आल्याने तो मैदानातच कोसळला. त्यामुळे त्याला लगेच घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर उपचार सुरू असतांना आज दुपारी त्याचे दुर्दैवी निधन झाले.
करणची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. दरम्यान सहा महिन्यापूर्वी त्याच्या आईचं निधन झाले होते. आपण सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करावी अशी त्याची इच्छा होती. यासाठी गेली 6 वर्षे तो सतत सराव करत होता.
*धाकट्या भावावर आली मृतदेह नेण्याची वेळ*
करण आणि त्याचा धाकटा भाऊ सोबत परीक्षेसाठी आले होते, मात्र धाकट्या भावावर करणचा मृतदेह नेण्याची वेळ आली.
मात्र अश्या देशसेवेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाच्या आकस्मित मृत्यूने संपूर्ण औरंगाबाद जिल्हा हळहळला आहे.