दैनिक चालु वार्ता /
प्रतिनिधी माकणी /
गणेश विठ्ठलराव मुसांडे :-
शेतकऱ्यां मधून नाराजी व सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत करावी अशी शेतकरी बांधवातून मागणी होत आहे.
दैनिक चालू वार्ता
उस्मानाबाद : – जिल्ह्यात गत काही दिवसापासुन मोठ्या प्रमाणात पाऊस होत असुन शेतामध्ये उभ्या असलेल्या पीकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ब-याच गावात पाणी शिरल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन ,उडीद, मुग, तुर, फळबागा, ऊस, , टोमॅटो अशा शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. शासनाच्या ई-पीक पाहणी करने हे तांत्रिक दृष्टया शक्य होत नसून मोबाईल नेटवर्क व ईतर कारणाने हे जाचक अटी मुळे शेतकरी नाराज. तरी झालेली नुकसान पाहणी प्रत्यक्षरित्या करुन झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन शेतक-यांना सरसकट भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱी वर्गामधुन होत आहे गरीब शेतकरी ह्या गोष्टी पासून वंचित राहत आहे तरी सरकार ने या गोष्टी कडे लक्ष देवून हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांने केली आहे
खरीप हंगामातील पीककर्ज १०० टक्के वाटप करण्याची मागणी
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासुन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत असल्याने शेतक-यांना पेरणीच्या वेळी पीककर्ज मिळत नाही. सध्या केंद्र शासनाच्या व राज्यशासनाच्या निर्देशानुसार रब्बी व खरीप हंगामात शेतक-यांना सरसकट पीककर्ज देण्यात यावे असे सुचवले आहे. परंतु राष्ट्रीयकृत बँकामार्फत गत वर्षांपासुनची अनेक प्रकरणे प्रलंबित असुन शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
राष्ट्रीयकृत बँका शेतक-यांना पीककर्ज वाटपास विलंब करत आहेत. पेरणी हंगाम संपत आला असुन तयार असलेली अनेक प्रकरणे पाटप केलेली नाहीत. राष्ट्रीयकृत बँकाकडुन ३१ ऑगष्ट पर्यंत पीककर्ज वाटपाची आकडेवारी खालील प्रमाणे –
१. *बँक ऑफ बडोदा ह्न ४१ % १०. युनियन बँक ऑफ इंडीया ह्न ६७%
२. बँक ऑफ इंडीया ह्न ५८% ११. ॲक्सीस बँक ह्न ४१%
३. बँक ऑफ महाराष्ट्र ह्न ४६% १२. एच.डी.एफ.सी. बँक ह्न २८%
४. कॅनरा बँक ह्न ३१% १३. आय.सी.आय.सी.आय. बँक ह्न ३३%
५. सेंट्रल बँक ऑफ इंडीया, ६९% १४. आय.डी.बी.आय. बँक ५७%
६. इंडीयन बँक (अलाहबाद), ४६% १५. रत्नाकर बँक ह्न २३%
७. पंजाब नॅशनल बँक ह्न ४३% १६. महाराष्ट्र ग्रामीण बँक ह्न ७०%
८. भारतीय स्टेट बँक ह्न ४०% १७. डी.सी.सी. ह्न ५७%
९. युनो बँक ह्न ३७%
यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी एकुण सरासरी ४४ % पीककर्ज वाटप केले आहे. खाजगी राष्ट्रीयकृत बँकांनी सरासरी ३९ % तर ग्रामीण बँकांनी ७० % तसेच सहकारी बँकांनी सरासरी ५७ % पीककर्ज वाटप केले असुन संपुर्ण आकडेवारी पाहता सरासरी ५१ % पीककर्ज वाटप केले आहे.ज्या बँकांनी १००% पीककर्ज वाटप केले नाही अशा संबंधित बँक अधिका-यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांमधून होत आहे