दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
शहाजी पाटील शिंदे यांचा जन्म हळदा तालुका कंधार येथे झाला हळदा हे गाव नांदेड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गाव या गावात मोठमोठे प्रशासकीय अधिकारी मोठमोठे राजकारणी व आमदार कंधार तालुक्यातील राजकीय सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे गाव म्हणजे हाळदा.
हळदा गावात ग्रामसेवक, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस उपाधीक्षक, पोलीस अधीक्षक,डॉक्टर, वकील असे मातबर प्रशासकीय अधिकारी राजकारणातील पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सभापती खरेदी-विक्री संघाचे चेअरमन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व विविध पक्षातील मातब्बर नेते व हळदा गावातील आमदार असा हाळदयाचा इतिहास आहे.
याच गावात शहाजी पाटील यांचा जन्म 5 सप्टेंबर 1982 ला झाला आजोबा हनुमंतराव पाटील शिंदे शिक्षक मुख्याध्यापक होते तर वडील बाबाराव पाटील शिंदे नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. बाबाराव पाटील शिंदे शिवसेनेचे कंधार तालुका प्रमुख (१५ वर्ष) उपजिल्हाप्रमुख खरेदी-विक्री संघाचे चेअरमन संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य असे विविध पदे भूषविलेले वडील असताना शहाजी पाटील हे सुद्धा सामाजिक कार्यात रस असल्याने तेसुद्धा समाजाचे काही देणे लागतो म्हणून समाजसेवा करण्यासाठी युगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या प्रेरणेतून संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश केला सुरुवातीला संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष नंतर जिल्हा संघटक या पदावर काम करीत असताना शहाजी पाटील यांच्या कामाची दखल घेऊन संभाजी ब्रिगेडचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी पाटील यांनी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करून सामाजिक कार्य करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली.
शहाजी पाटील यांनी संभाजी ब्रिगेड मध्ये असताना तालुकास्तरीय बळीराजा महोत्सव हाळदा येथे संभाजी ब्रिगेड चे राज्य नेते आनंद दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. शहाजी पाटील दरवर्षी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपत असतात.
मध्यंतरीच्या काळात राजमुद्रा सामाजिक संघटनेत प्रवेश केला राजमुद्रा चे संस्थापक आदरणीय सचिन पाटील इंगोले प्रदेशाध्यक्ष शिवप्रसाद पाटील तेलंग राज्य सचिव सचिन भाऊ चव्हाण यांनी शहाजी पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन
राजमुद्रा च्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदाची फार मोठी जबाबदारी दिली राजमुद्रा च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शहाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून संघटन मजबूत करण्यासाठी राजमुद्रा च्या गाव तिथे शाखा स्थापन करण्याचा धडाका लावला संघटन मजबूत करत असताना कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कंधार तहसील कार्यालयावर रुमणे मोर्चा काढून राजमुद्रा कायम शेतकरी बांधवा सोबत असल्याचे दाखवून दिले सतत अन्यायाला वाचा फोडण्याचे काम राजमुद्रा च्या माध्यमातून चालू आहे कंधार तालुक्यातील खराब रस्त्यामुळे बांधकाम विभागातील अनोखे आंदोलन आजही चर्चिले जाते.
कोरोणाच्या महामारी रक्ताचा तुटवडा भासल्यामुळे प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन महारक्तदान शिबिराचे मुखेड येथे आयोजन करून 189 रक्तदात्यांनी या शिबिरात भाग घेऊन रक्तदान केले. मराठा आरक्षणाचा व शेतकरी बांधवांवरील व जिल्ह्यातील विविध प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या आदेशावरून केले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर राजमुद्रा चा आक्रोश मोर्चा हा अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारा होता आक्रोश मोर्चात प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. आक्रोश मोर्चा यशस्वी झाला तो फक्त सहकारी कार्यकर्तानमुळेच असेही शहाजी पाटील सांगत असतात.
अडचणीत असणाऱ्या ला मदत करणे हा शहाजी पाटील यांचा छंदच . आपला सहकारी किंवा मित्र अडचणीत सापडला तर न कोणी सांगतात स्वतः पुढे होऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणजे शहाजी पाटील सुखात कमी पण दुःखात सर्वात पुढे असणारा कार्यकर्ता म्हणजे शहाजी पाटील साधी राहणीमान उच्च विचारसरणी असणारे शहाजी पाटील वडीलधाऱ्यांचा मान सन्मान करणे हा त्यांचा एक चांगला गुण.
एसटीचा प्रश्न असो तहसीलचा असो पंचायत समितीचा असो पोलीस स्टेशनचा प्रश्न असो त्या ठिकाणी स्वतः जाऊन मदत करणारा कार्यकर्ता शहाजी पाटील.
शहाजी पाटील यांनी बहुजन साक्षर भारत प्रेरक प्रेरिका संघटनेचे ७ वर्ष प्रदेशाध्यक्षपदा वर सुद्धा काम केले आहेत. प्रदेशाध्यक्ष असताना शहाजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर पुणे मुंबई व!!दिल्ली संसद भवनावर!!
सुद्धा प्रेरक-प्रेरिकांना न्याय मिळावा म्हणून आंदोलने मोर्चे काढणारा कार्यकर्ता म्हणजे शहाजी पाटील. जातीपातीला न मानणारा. आपल्या मित्रासोबत सहकाऱ्या सोबत कुठेही बसणारा साधा सरळ वागणारा मानपान न बघणारा शांत संयमी वेळ प्रसंगी आक्रमक होणारा कार्यकर्ता म्हणजे शहाजी पाटील.
प्रत्येकाला आपला वाटणारा निस्वार्थी निर्भड स्पष्ट बोलणारा आक्रमक मन्याडचा वाघ म्हणून ओळख निर्माण केली आहे. शहाजी पाटील यांच्यासोबत जिवाभावाचा कार्यकर्ता आहे मित्रपरिवार खूप मोठा आहे.राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचे विचार जनसामान्यात रूजवण्यासाठी गोरगरिबांना न्याय मिळावा म्हणून सतत संघर्ष करणारा, संघर्षातून पुढे येत असलेल्या युवा नेतृत्व, विश्वासु नेतृत्व, अडचणीत १०० टक्के मदत करणार नेतृत्व, झुंजार नेतृत्व, मनमिळावु नेतृत्व, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार नेतृत्व, मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय शहाजी पाटील शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
शुभेच्छुक
राजमुद्रा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य