दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अमरावतीत एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर जिल्ह्यातील वातावरण चांगलच तापलं आहे.या प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांच्यासह हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत.अमरावतीच्या पोलीस ठाण्यात खासदार नवनीत राणा आणि पोलीसांमध्ये मोठा वाद निर्माण झाला.
अमरावतीत एका हिंदू युवतीचे अपहरण करून तिचा आंतरधर्मीय विवाह केल्याचे प्रकरण समोर आले असता लग्नानंतर मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप मुलींच्या नातेवाईकांनी केला आहे.पोलीसांनी पीडित मुलीला पोलीस ठाण्यात आणावं.या प्रकरणी तपासाला इतका उशीर का लागतोय,असा प्रश्न करत खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात गोंधळ घातला.हा गोंधळ जवळपास अर्धा तास चालला.
या प्रकराणातील प्रत्यक्षदर्शी माहिती जाणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी खा.नवनीत राणा राजापेठ ठाण्यात पोहोचल्या.यावेळी पोलिसांनी तपास सुरु असल्याचं सांगत लवकरात लवकर मुलीची सोडवणूक करु,असं सांगितलं.त्याचवेळी नवनीत राणा यांनी पोलीस ठाणेदारावर गंभीर आरोप करत तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला,असा सवाल विचारला.तेथे खा.नवनीत राणा यांची कॉल रेकॉर्डिंगवरून पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्याशी मोठा वार्तालाप झाला.आम्ही महिला दलित लोकप्रतिनिधी आहोत त्यामुळे आपण माझी कॉल रेकॉर्डिंग करता असा आरोप नवनीत राणा यांनी केला.
खा.अनिल भोंडे काय म्हणाले?
अमरावतीमध्ये एका मुलीला पळवून नेलं आहे,तिच्या भावाने मला काल सांगितलं,मी प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलीसांना दिली आहे,त्या पोराला पकडून आणलं तो मुलगा अजूनही सहकार्य करत नाहीये,त्यालाच माहितीये ती मुलगी कुठे आहे.पोलीसांना माझी विनंती आहे की त्यांनी सहकार्य करावं,परंतू आता धारणीमध्येही एका मुलीला हैद्राबादला नेलं होतं,त्या मुलीचाही आता फोन आला की तिला अमरावतीला यायचं आहे,मला तिथे त्रास दिला जातो आहे,मारहाण केली जातेय,धारणीच्या आणि अकोट पोलीसांना मी सांगितलं की आपली रेस्क्यू टीम पाठवा आणि त्या पोरीला सोडवून आणा.माझी पोलीसांना विनंती आहे की त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं,कारण अमरावतीतील पोरीला सोडवून आणणं तसेच धारणीतील मुलीला वाचवणं महत्त्वाचं आहे.पोलीसांनी जेवढं गांभीर्य दाखवायला हवं तेवढं दाखवलेलं नाही.अमरावतीत अशी ४ प्रकरणं,धारणीत २० प्रकरणं आतापर्यंत घडली आहेत.पोलीस तक्रार घ्यायला तयार नाहीत असा आरोप संबंधित नातेवाईकांचा आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील या शहरात मिळाली बेपत्ता युवती
एस.पी.कार्यालय पुणे व सातारा यांना संबंधित प्रकरणाची माहिती दिली होती आणि एस.पी.कार्यालय सातारा यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती येथील बेपत्ता मुलगी ही एकटी मिळाली असून ती रेल्वेमध्ये प्रवास करीत आहे.मुलीचा मोबाईल बंद असून ती अमरावतीकडे जाण्यासाठी एकटीच रेल्वेने प्रवास करीत असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी प्रसार माध्यमातून दिली.