दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाई -संभाजी गोसावी
वाई. वेळे येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांचे औचित्य साधून गणेशोउत्सव कालावधीत रणसंग्राम मित्रपरिवार वेळे तालुका वाई यांनी देशसेवा करणाऱ्या सैन्य व पोलीस दलातील जवानांचा सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यांत आले. वेळे येथील मारुती मंदिर चौकात वाईच्या कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शितल-जानवे खरडे मॅडम व भुईंज पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या हस्ते गावातील चाळीस जवानांचा गौरव करण्यांत आला. रणसंग्राम मित्र परिवारांच्या वतीने दरवर्षी आगळावेगळा उपक्रम राबविण्यांत येतो यंदा स्वातंत्र्य दिनांच्या अमृत महोत्सवांचे औचित्य साधून गावातील सर्वच आज माजी सैनिक व पोलीस दलातील जवानांचा सन्मान करण्यांत आला. डॉ. शितल जानवे खराडे मॅडम यांच्या उपस्थिंतीत रणसंग्राम गणेश मंडळातील गणाधिशाची आरती करुन पुढील कार्यक्रमांस सुरुवात केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.शितल जानवे खराडे मॅडम पुढे म्हणाले… देशसेवा बजविणाऱ्या सर्वच जवानांचा आम्हांला अभिमान वाटतो त्यांच्या हातातून चांगली देशसेवा घडली व यापुढेही आपल्या गावातील तरुणांनी अशीच प्रगती करावी व वाढत्या समाजाचा आलेख नेहमी वाढवा वाढता ठेवा असे आवाहन डॉ. शितल जानवे खराडे मॅडम यांनी केले या रणसंग्राम मित्र परिवारांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांस भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे,बीट अंमलदार विजय देशमुख ,गोपनीय विभागांचे सचिन नलावडे यांच्यासह वेळे गावातील चाळीस जणांचा सन्मान करण्यांत आला. यावेळी रणसंग्राम परिवारांच्या वतीने शरद पवार,दीपक पवार ,जितेंद्र पवार तसेच उपस्थिंतीत ग्रामस्थांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यांत आले.