दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- गेल्या ६ महिन्यापासून अंजनगाव सुर्जी,मेनपूरा रहिवाश्यांनी स्थानिक सदर नालीवरील काँगरिटीकरण निघाल्यामुळे न.प.अंजनगाव सुर्जी कार्यालयात तक्रार केली होती परंतु मुख्याधिकारी यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल नाममात्र घेतली होती असे स्थानिकांनी दै.चालु वार्ता जिल्हा प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले होते.वारंवार स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे तोंडी तक्रार केल्याचे सुद्धा नागरिकांनी सांगितले असता पत्रकार श्रीकांत नाथे यांनी न.प.कार्यालयाशी संपर्क साधला व गणपती रोड,मेनपूरा येथील नागरिकांनी आपल्याकडे वारंवार केलेल्या तक्रारीची दखल आपण का बरं घेत नाही?दोन दिवसांनी श्री गणपती बाप्पाच्या मिरवणुका ह्याच रोडवरून जातात आणि त्या खड्डयात जर कोणी एखादा व्यक्ती पडला तर त्याला अपंगत्व येऊ शकते?असे न.प.कर्मचाऱ्याशी भ्रमणध्वनी वरून बोलतांना म्हटले तसेच आम्ही आमच्या स्तरावर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊ असे सुद्धा पत्रकार यांनी म्हटले.आज ९ सप्टेंबर रोजी सदर नालीवरील निघालेल्या काँगरिटीकरणाचे काम न.प.कार्यालयाने पूर्णत्वास नेले.पत्रकार श्रीकांत नाथे यांचे मेनपूरा,सुर्जीमधील नागरिकांनी बोलतांना आभार मानले.आपल्या वृत्तपत्रामार्फत प्रकाशित केलेल्या बातमीच्या प्रभावामुळे दोन दिवसांच्या आत कामाची दखल घेऊन भविष्यात नागरिकांना होणारी दुखापत टळली व नागरिकांच्या जीवाची आपण तात्काळ घेतली असे स्थानिक नागरिकांनी पत्रकार श्रीकांत नाथे यांच्याशी बोलतांना म्हटले.