दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा-संभाजी गोसावी
सातारा : सातारा जिल्ह्यांचे राजघराण्यांतील श्रीमंत. छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराजांचे 12 वे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे अल्पशा आजारांने निधंन झाले.. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सातारा,कोल्हापूर आणि बडोदा येथील राजघराणे एकत्र आले.. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याने त्यांना पोलिसांकडून शासकीय मानवंदना का दिली गेली नाही? इच्छा असती तर ते पण शक्य झाले असते..
मराठ्यांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना मानवंदना का दिली गेली नाही याचे उत्तर कोण देऊ शकेल का?
सातारकरांनी दुकाने आणि व्यवसाय बंद ठेऊन दुःख व्यक्त केलं
आपले सातारकर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ट्विट केलं की खुश झाले..! काहींनी स्टेटस देखील ठेवलं पण
जिल्ह्यात 1 मंत्री, 11 आमदार, 3 खासदार असून प्रत्यक्ष किती जण हजर होते?
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचं राजकीय वलंय नसलं तरी सामाजिक,क्रीडा क्षेत्रात आणि दोन्ही राजेंच्या वादाचे मनोमिलन करण्याचे त्यांचे योगदान होतं आणि आहे.. साताऱ्यात अजून एक राजघराणे आहे मात्र त्यापैकी आमदार आणि खासदार दोघे ही उपस्थित नव्हते इथ हा विषय वादाचा होईल मात्र आजचा संपूर्ण अंत्यविधीचा घटनाक्रम पाहिला तर जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री हे साताऱ्याचे, जिल्ह्याला केवळ एकच मंत्री असताना राजघराण्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी एकही राज्य शासनाचा मंत्री उपस्थित नाही ?
हे मनाला चटका आणि विचार करायला लावून जाणारे आहे.