दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ अंडर-17 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं नेपाळविरुद्ध एकतर्फी विजय मिळवलाय. या सामन्यात भारतानं नेपाळला 4-0 नं पराभूत करून सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकलीय.
भारताकडून बॉबी सिंह कोरोऊ सिंह कर्णधार वनलालपेका गुईटे आणि अमन यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला. नेपाळनं ग्रुप लीगमध्ये भारताचा 3-1 ने पराभव केला, परंतु अंतिम फेरीत भारताविरुद्ध एकही गोल करू शकला नाही.
या सामन्याच्या 18 व्या मिनिटांत भारताकडून बॉबीनं गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.बॉबीच्या गोलमध्ये गुईटेनं महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, 12 मिनिटानंतर कोरोऊ सिंहनं गोल करून भारताच्या खात्यात आणखी एका गोलची भर घातली.त्यानंतर नेपाळचा संघ गोल करण्यासाठी धडपड करताना दिसला. नेपाळच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. दरम्यान, कर्णधार प्रशांत लक्षमनं 39व्या मिनिटाला डॅनी लश्रामला कोपरा मारला, ज्यामुळं त्याला रेड कार्ड दाखवण्यात आलं. सामन्याच्या मध्यांतरनंतर 63 व्या मिनिटा गुईटेनं भारताकडून तिसरा गोल केला. तर, अमनं इंजरी टाईमध्ये चौथा गोल करून भारताच्या विजयाचा पाया रचला.
=====================
भारतीय कर्णधार गुईटेला स्पर्धेतील सर्वात उपयुक्त खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. तर, साहिलला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कार मिळालाय.
=====================
भारताच्या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक म्हणाले
भारताचे मुख्य प्रशिक्षक विबियानो फर्नांडिस यांनी आपल्या खेळाडूंचे कौतुक केले.”मला माझ्या खेळाडूंचा खूप अभिमान आहे. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. सहाय्यक कर्मचारी आणि खेळाडू दोघानांही भारताच्या विजयाचं समान श्रेय जातं.”