दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रदेशाध्यक्ष जिनत कोहिनूर सय्यद ह्या एकमेव अशी महिला आहेत की त्यांची या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे
भूम:-तालुक्यातील बेलगाव- पिंपळगाव या गुप ग्रामपंचायतीच्या सरपंच परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष जिनत कोहिनूर सय्यद यांना या वर्षीचा राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार जाहीर झाला आहे .रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष सिनेअभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे . सय्यद यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एकमेव महिला आहेत त्यांना या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. बेलगाव- पिंपळगाव या गुप ग्रामपंचायतीच्या गेल्या सात वर्षापासून सक्षमपणे जीनत सय्यद सरपंच म्हणून काम पाहत आहेत.त्यांनी सक्षमपणे गावच्या विकासासाठी काम केला आहे. त्यांनी शासकीय योजना गाव स्तरावर मोठ्या प्रमाणात राबवलेल्या आहेत. तसेच महिलांसाठी व्याख्यानमाला , विविध विषयावर शिबिरे , मार्गदर्शन इत्यादी उपक्रम राबवले आहेत .सय्यद यांनी नावाला सरपंच पद न भूषवता गावामध्ये विविध उपक्रम राबवत आपल्या कार्याची छाप महाराष्ट्रभर पसरविली आहे .यामुळेच त्यांच्यावर सरपंच परिषदेच्या महिला प्रदेश प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे . त्यांच्या या कार्यामुळेच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मालिका मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्वनी महांगडे यांच्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठन यांनी दखल घेत नवदुर्गा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित केला आहे.पुरस्कार घोषित झाल्याबद्दल रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे राज्य कार्याध्यक्ष निलेश जगदाळे , उस्मानाबाद जिल्हा प्रवक्ता राम जळकुटे , सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले , मार्गदर्शक शंकर खापे , सरचिटणीस तथा उद्योजक प्रवीण रणबागुल , कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ , मराठवाडा अध्यक्ष सतीश सोने , उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर , उपाध्यक्ष किरण व्हरकट , कार्याध्यक्ष बाळासाहेब जेवे , महिला जिल्हाध्यक्ष परियंका रणबागुल , सरपंच अतिक शेख , विशाल ढगे , रमेश कोकाटे , बालाजी कुटे , विश्वास टकले यांच्यासह सरपंच प्रतिनिधी यांनी अभिनंदन केले आहे .