दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
गणेश उत्सव अन् गौरीचा उन्हाचा खडावा संपून पावसाचा काटा कमी कमी येत होता.आणि काही दिवसातच़ दसरा सणाची चाहूल लागणार होती .त्या मधल्या काळात शेतकरीवर्ग भात कापणी,भुईमूग शे़गा तुर कुळथी या सारखी पिक कापणीच्या कामात असायची आम्ही पोरंटारं अर्धी मुर्धी शाळा सोडून आई बाबांच्याचसह रानात हजेरी लावायाची सवय नेहमीचीच़.
खेड्यापाड्यातील वातावरण खूप आनंदी आल्हाददायक आसायचे….काही दिवसात थंडीची चाहूल लागणार असल्याने सर्वांनाच मनसोक्त वाटायचे पावसाळयात गारटलेली रानपिकं ,रानपाखरं मुक्की जनावरं बाया माणसं पोर टारं सगळी कशी तरतरीत वाटायची….।
दसरा सण म्हटलं की घर ,वाडा सारं सारवा सारव असाची.पूर्वी चिखल मातीची घरे असल्यामुळे दसरा सणाच्या अगोदर काही दिवस पूर्वी पांढऱ्या मातीत पाणी घालून जुन्या फाटक्या वाकळचे छोटे छोटे तुकडे करून बोळे तयार करून ते मातीच्या पाण्यात बुडवून संपूर्ण घरे, वाडे सारवून काढायचे ..। तवा साऱ्या गल्ली बोळातनं पोरंटारं आई बाबाना मदत करायची.घरातला सारा पसारा अंगणात मांडायचा पांढऱ्या मातीच्या पाण्यानं साऱ्या भि़ती सारवायच्या.घरातील लाकडी साहित्य धुवून काढायचं आणि पुन्हां परत त्या जागेवर ठेवायचे हे काम चार आठ दिवस असायचे.घरातील बाया माणसं भा़डी कु़ंडी धुवून काढायचं आणि पुन्हा स्वच्छ करून ठेवायची.पुर्वी खेडवळं गांव होती आमचे गांवा शेजारीं नदी नाले असायचे कायम तुंडूब भरलेले .नदी काठावर गवती कुरणं, हिरवी गार शिवारं ,कुरणातून गावाजवळून आलेला खळखळ वहाणारा ओढा, नदी ,ओढ्यावर बाया माणसं पोरंटारं धुणं धुवायला गर्दी करायची.धुणं धुवून ति़थंच वाळवायची .दुपारी दही भाकरी कांदा खर्डा अस्सल गावरानं जेवण ंजेवायच़ आणि सायंकाळी बापय माणसं सायकलीवरणं सारं धुणं घरी आणायच़ हे दोन चार दिवस चालायचं..तवा शाळेला सुट्टी असायची ,अधून मधून पाऊस पडायचा त्यामुळे शाळेत कमी घरात जास्त असंचं दिवस होतं.
डोंगरावरील देव बसलं की दसरा सणाला सुरवात होते.दुसऱ्या दिवशी गावातील ग्रामदैवतच्या देवळात घट बसवून मंदिरात पुजा करून गावातील लोक आपल्या घरी घट बसवून दसरा सणाची सुरवात व्हायची.ज्या दिवशी सायंकाळी मंदिरांत घट बसवून दिवा वातीचा करून तेल घालून वाती पेटवायच्या त्यावेळी जर पाऊस पडला की पाऊस वातीत गावला आणि त्या वर्षी पाऊस चांगला राहील असा समज होता पाऊस नाही पडला की पुढी वर्षी पाऊस काळ कमी अशी समज होती.
नऊ दिवस दसरा उत्साहही वातावरणातही असायचा.
दसरा सणासाठी लहानसहान, बाया, माणसं ,म्हातारी कोतारी साऱ्यासाठी नवीन कपडे ,फराळाचे साहित्य खरेदी करण्यासाठीच बाहेर शहरात जायची वस्तु.खरेदी करुन आली की गावात बोटावर मोजण्या ईतके टेलर असायचे तेथे कपडे शिलाईसाठी लोक गर्दी करायचे काही बसुुुन कपडे शिवून घेत होती. आम्हा पोरांना हौस मोठी असायची.गावात चार सहा सावकरांच्या चार चाकी गाड्या असायच्या ,लोक हौसेने भाडे देऊन दुर असणणारे दैवांना तेल घालण्यासाठी जत्रा म्हणुून जायची.काही शेतकरी आपले बैलगाडी घेऊन देवांना दोन दिवस प्रवास करत होती.कुलदैवत ज्योतिबा,नाईकबा भैरोबा रेणुका,लांबच्या गांवाला जायची मोठी हौस असायची. डोंरग झाडीतली गांव बघायला मिळायची ,वाटेत बस, डोंगरझाडीतुन जाणारी आगीनगाडी तवा नवल वाटायचे.
आगीनगाडी झाडाच्या ,डोंगरातील एकाद्या भुयारातून जात असली कि आम्ही बैलगाडी रस्त्यावरच्या कडेला उभं राहून बघत असायचो.तवा नेहमी एक गांण़ लहान मुलांच्या तोंडात गुणगुणत असायचं,
झुकझुक, झुकझुक आगीनगाडी
धुरांच्या रेषा हवेत काडी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊ या….!!
दोन चार दिवस आमचे खूप आनंदात जायचे.देवाच्या ठिकानी गाड्या सोडायच्या.सोबत घेऊन गेलेला पसारा ओळखीच्या पुजारी यांनी दिलेल्या एकाद्या खोलीत सारं ठेवायचे.एक दिवस तिथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून देवदर्शन करायचे.बाजारात आईबाबा सोबत खेळणी घ्याचे.मौज मज्जा असायची.मग पुन्हा आम्ही गावाकडं यायचं.पुन्हा दसऱ्याची तयारी.
गावात नऊ दिवस लोक तेल घालायला गर्दी जमायची रोज एकादे देवळात भजन, किर्तनकार यांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरण असायचे घराघरांत आया बाया कडाखणे ,काणुले,धपाटे असे अणेक चमचमित पदार्थ करण्याची धावपळ दिसुून येत होती.
दिवसभरं पिठ मळून तयार करायचे व गल्लीत आयाबायांना बोलवून फराळ तयार करुन ठेवायचे पंधरवडा घरातील सर्वाची मेजवानी असायची.नऊ दिवशी गावातील शेतकरी आपले रानातील प्रत्येक मंदिरांत दोन दोन ऊस देवाला अर्पण करत असायचे.दिवसभर जाणकार ,पोरंटारं रानामाळात जाऊन सोन्याच्या व आपट्याच्या पांनाच्या फांद्या घरी आणुन ठेवत असत.
दसरा सणा दिवशी गावातील लोक नटून थटून पोरंटारं सह गाव चावडीजवळ गोळा व्हायची.आख्खागांव जमायचा एका बैलगाडी तून सोन्याच्या, आपट्याच्या झाडाच्या फांद्यांचा भारा बैलगाडीत भरुन वाजत गाजत नदीघाटावर जायची.
नदीघाटावरजायचे तिथं रांगोळ्या काढून आपट्याची, सोन्याच्या पानंची रास केली जायची पुजा झाले वर गावकामगार पोलीस पाटील व काही गावकरी मंडळी या़च्या धाकात लोक होते त्यामुळे गावातील एखाद्या व्यक्तीकडे बंदुकीचा हवेत गोळीबार केल्यानंतर मगचं सोने लुटायचे असा रिवाज होता .त्याप्रमाणे सर्व कार्यक्रम
उत्सवात पार पडायचा.मग लोक ग्रामदैवत मंदिरं येथे जाऊन मानाचं सोन्यच्या ,आपट्याची पानं देवाला अर्पण करून घरी येत .घरी आलेवर प्रथम ती पाने घरातील देवाना घालुन घरातील वडील धारी माणसांची आशीर्वाद घेत असत.व प्रत्येक माणसं आपले मित्र, नातेवाईकांची घरोघरी जाऊन भेटायचे सोन्याच्या,आपट्याच्या पाने देऊन आपला आनंद साजरा करत होती.
पुर्वीचे सणवार खूप दिवस चालायचे पै पाव्हणै खूप दिवस रायचे आनंदी आनंद होता.
पण आजकाल धावपळीचे युगात पूर्वीसारखं सणवार साजरे होत नाहीत माणूस माणसाला भेटत नाही त्यामुळे माणूसकी कमी होत आहे.पुर्वी सारखं घराघरांत आया बाया माणसं भेटायची एकमेकांना फराळ वाटायचे दिसत.आता ते कार्य मात्र दुर्मिळ झाले आहे. मोबाईलच्या युगात तरुणाई गुरफटली असून पुर्वीचा सणवार साजरे करण्यामागे लोक एकत्र यावे यासाठी प्रयत्न करत होते. हे समजुूून येत नाही.माणसातील माणूसकीचा र्हास कमी होत आहेत.
माझ्या आठवणीतील दसरा सण आज ही आठवतो खेडवळ गांव,खेडवळ माणसं,खेडवळं वागणं,खुूप आनंदमय, आल्हाददायक, असं होतं.दसरा सणाविषयी चार ओळी आठवल्या,
..। दसरा सण खूप मोठा होता
आपट्याच्या पानाला मान होता
माणूस माणसाला घरात भेटत होता
सणवार घराघरांत फराळ होता
जुनं तें सोनं ,दादा पुर्वी,
माणूस मायाळू होता, मायाळू होता…।।
सोनं घ्या सोन्यासारखं रहावां।।
कवी सरकार इंगळी ता हातकणंगले
जि कोल्हापूर.