दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
आपल्या जीवनात जेव्हा फक्त गर्द अंधकार असतो . सगळं काही संपल्या सारख वाटत असतं .आता जीवनात काही अर्थ शिल्लक नाही अशी भावना निर्माण होते .आपण पुर्ण खचुन जातो . शरीरात फार उत्साह राहत नाही .अशा वेळी दिसणारा आशेचा एखाद्या किरण आपल्यासाठी जीवन बदलणारा असतो .मग सदैव प्रकाश देणारा सुर्य हा आपल्यासाठी उपयोगी आहेच पण आपलं सगळ काही संपुष्टात आलं तेव्हा दिसलेला आशेचा एक किरण आपलं आयुष्य बदलणारा ठरल्याने आपल्यासाठी तो किरण महत्वाचा आहे उपयोगी आहे.जीवनात आनंद असल्यानंतर अख्खं जग तुमच सोबती आहे .हे ञिकाल सत्य आहे.पण आपण दुःखात असताना अडचणीत असताना तणावात असताना कोणिही आपलं नसत मग नेमकं अशा वेळी ज्यांनी छोटं मोठं सहकार्य केले. आपल्या वाईट वेळेत थोडं बहुत आशेचा किरण दाखवला तेच आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचे.मग ते छोटं असो कि मोठे असो् .अवेळी प्रचंड असं सहकार्य झालं तरी ते फार उपयोगी नसतं . आवश्यकता आहे ती त्यावेळी मिळालेलं छोटं सहकार्य जीवण तारून नेत . म्हणून सहकार्य मदत हि कधी झाली कोणत्या वेळेला झाली याला खूप महत्व आहे.आपल्या जीवनातील एखाद्या च महत्व हे त्याच्या मोठेपणावर ठरत नाही. आपल्या कठिण काळी कोण उपयोगी पडलं मग ते छोटं मोठं कसं हि असो महत्व त्यालाच असतं . प्रचंड तहान लागली पाण्यावाचुन जीव कासावीस होत आहे.मग तहान लागली नसताना आपल्या जवळ असणारा समुद्र ज्या वेळी आपण एक घोट पाण्यासाठी कासावीस होतो . तेव्हा मात्र समुद्र आपल्या काही कामाचा आहे का ? तर आपल्या साठी जिथल पाणी उपलब्ध असेल तिथलं एक घोट पाणी महत्वाचं असतं. जे आपली ताहण भागवेल.महणुन सुर्य प्रचंड प्रकाशमान आहे . त्याबद्दल शंका नाही.पण आपण अंधारात प्रवास करताना रात्री चमकणारा छोटासा काजवा आपल्यासाठी दिशादर्शक मार्गदर्शक असतो . कारण तो उजेडात नाही तर अंधारात आपली साथ देण्यासाठी योगदान देत असतो . म्हणून उजेडातील सुर्य पेक्षा अंधारात आपली साथ देणारा काजवा आपल्यासाठी हितकारक उपयोगी असतो.प्रत्येक बाबीच महत्व हे त्या बाबींच्या उपलब्धतेनुसार नाही तर वेळेनुसार ठरत असतं . मिष्ठान्न उपलब्ध आहे पण भुक नाही . आणि जेव्हा भुक लागली तेव्हा चटणी भाकरी उपलब्ध आहे.मग आपल्यासाठी उपयोगी काय मिष्ठान्न कि चटणी भाकरी तर वेळेवर उपलब्ध झालेली चटणी भाकरी आपल्यासाठी महत्वाची आहे.महणुन वेळेला खुप महत्व आहे . आपल्या वेळेला काय आवश्यक आहे . आणि काय उपलब्ध आहे याला ते आपल्यासाठी महत्वाच . अवेळी उपलब्ध काय या पेक्षा योग्य वेळी काय कामी पडलं ते जीवनात आति महत्वाचं असतं . प्रत्येक गोष्टीचं महत्व वेगवेगळे आहे .पण आपण संकटात असताना आपल्या उपयोगी जे पडलं ते आपल्या साठी जास्त महत्वपूर्ण असतं . सुर्य हा सृष्टी वरील सगळ्यात जास्त प्रकाश देणारा आहे पण आपण रात्री अंधारात प्रवास करतोय मग आपल्या साठी अंधारात थोडा नगण्य प्रकाश दाता आशेचा किरण दाखवणारा काजवा महत्वाचा असतो.कारण अंधाराशी लढताना तो आपल्याला शक्ति बळ उमेद देतो .सकाळ होईपर्यंत आपल्या मध्ये उर्जा टिकवून ठेवतो . म्हणून आपल्या साठी उजेडातील सुर्या पेक्षा अंधरातील काजवा खूप महत्वाचा आहे.कारण सगळ्या दिशा सगळ्या वाटा बंद असताना आपल्या काजवा अंधारात दिशा मार्ग दाखवतो . म्हणून आपल्यासाठी काजवा हा सुर्या पेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे.महणुन परस्थिती नुसार महत्व ठरत असतं जीवनातील काळ आणि वेळ याला खूप महत्त्व असतं . पेशंट जेव्हा खुप नाजुक स्थिती मध्ये असतो तेव्हा डॉक्टर त्याच्यासाठी देवा पेक्षा कमी नसतो . एखाद्या व्यक्तीच्या जवळ कोट्यवधी रुपये आहेत परंतु नेमक त्याला गरज असेल तेव्हा त्याच्याकडं जवळ किती पैसे आहेत याला महत्त्व असतं. सुर्य हा खुपच प्रकाशमान आहे.परंतु आपण काळाकुट्ट अशा अंधारात घनदाट जंगलातून प्रवास करत असताना जो काजवा दिसेल आणि त्याचा छोटा पण आपल्यासाठी योग्य वेळी लाभलेला प्रकाश हा आपल्याला सुर्याच्या प्रकाशा पेक्षा जास्त महत्वाचा असतो . एकंदरीत काय तर आपण जेव्हा संकटात असतो . अडचणीत असतो तेव्हा आपल्या जे सहकार्य होईल मग ते छोटं असो वा मोठं असो तेच आपल्या कामाचं असतं . आणि नंतर काहीही मिळाल उपलब्ध झालं तर ते आपल्या साठी फार महत्वपूर्ण नसतं .जे संकटं काळी कमी पडलं तेच महत्वाचं . म्हणून सहकार्य मदत छोटी कि मोठी याला महत्व नाही योग्य वेळी कामी काय पडल याला महत्व असत.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301