दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा-संभाजी गोसावी
जिल्ह्यांमध्ये भटक्या विमुक्त तसेच दशनाम गोसावी समाज हा समाज सातारा जिल्ह्यांमध्ये आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह गोसावी समाजाच्या विविध मागण्यांकरिता याबाबत निवेदन देण्यांत आले होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा भटक्या विमुक्त गोसावी समाजाला चांगला दिलासा मिळाला. याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यांचे नव्यानेच पदभार घेतलेले जिल्हाधिकारी माननीय रुचेश जयवंशी यांनाही सोमवारी दुपारी गोसावी समाजाच्या विविध मागण्यांकरिता संभाजी पुरीगोसावी यांनी समक्ष जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये निवेदन दिले. या निवेदनांत जिल्ह्यांतील भटक्या विमुक्त गोसावी समाजांची प्रलंबित प्रश्न मार्गी लागावीत. त्यांना हक्काची घरे मिळावीत, जिल्हा परिषद माध्यमांतून समाज कल्याण विभागाकडूंन त्यांना अनुदान व इतर सोयीसुविधा राज्य शासनाकडूंन लागू हव्यात. भटकया विमुक्त गोसावी समाजाला जिल्हा प्रशासनानांचे चांगले सहकार्य असावे. आज आपल्या सातारा जिल्ह्यांतील गोरगरीब आपल्या कुटुंबासह उघड्यांवर उदारनिर्वाह करत आहे. तरी साहेब तुमच्या कार्यकाळामध्ये नक्कीच गोसावी समाजाला सहकार्य मिळावे. अशी या निवेदनांत जिल्हाधिकाऱ्यांना संभाजी पुरीगोसावी आणि जिल्हाध्यक्ष मा.जगन्नाथ गिरीगोसावी यांच्याकडूंन विनंती करण्यांत आली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी पुढे म्हणाले मी हिंगोली जिल्ह्यांत असताना सुद्धा भटक्या विमुक्त गोसावी समाजाला माझ्याकडूंन चांगले सहकार्य मिळाले या सातारा जिल्ह्यांतील गोसावी समाजाला ही माझ्याकडूंन आणि जिल्हा प्रशासनाकडूंन नक्कीच सहकार्य राहील अशी मी ठाम ग्वांही देतो असे जिल्हाधिकारी श्री.रुचेश जयवंशी म्हणाले.