दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
माळी समाज कष्टकरी, शेतकरी असल्याने शिक्षणामध्ये काहीसा मागे आहे. शिक्षणामध्ये समाजातील युवक- युवतींनी पुढे जाऊन समाजाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, उद्योगासाठी मार्गदर्शन करणे, समाज मोठा असल्याने समाजाला लोकप्रतिनिधी मिळवून देण्यासह फुले जयंती, पुण्यतिथी आदी उत्सवाबरोबरच पर्यावरणाच्या रक्षणासाठी अधिकाधिक वृक्ष लावण्यासाठी प्रयत्नशील राहू. माळी समाजासह पोट जातींना एकत्र करून समाजाचे मोठे संघटन उभारण्यात येईल, अशी भूमिका मुंबई हायकोर्टाचे ॲड, नितीनजी राजगुरू यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील माळी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाज बांधवांची, माळी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेमध्ये विविध पदांवर निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील माळी समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
इंदापूर तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी खालील प्रमाणे
विकास शिंदे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष,करण झगडे पश्चिम महाराष्ट्र युवक कार्याध्यक्ष, अनिल झगडे पुणे जिल्हा सचिव, ओंकार झगडे इंदापूर तालुका अध्यक्ष, स्वप्निल गदादे इंदापूर तालुका युवक अध्यक्ष, शांताराम बोराटे इंदापूर शहर अध्यक्ष, विजय शिंदे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष, निखिल शिंदे सचिव, संतोष शिंदे सदस्य, युवराज शिंदे इंदापूर तालुका उपाध्यक्ष यांचा सत्कार समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी पोलीस मित्र परिवार महाराष्ट्र राज्य महिला राज्य संघटक, तसेच मानव विकास परिषद महिला महाराष्ट्र प्रदेश सचिव, इंदापूर पोलीस स्टेशन महिला दक्षता समिती सदस्या ज्यांना नवरात्र उत्सवात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्कार विजेत्या सौ रेश्मा नौशाद शेख यांचा माळी समाज बांधवांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
रेश्मा नौशाद शेख यांनी यावेळी बोलताना सांगितले की समाजातील मुले अधिकारीपदापर्यंत पोचत नाही. समाज बांधवांनी अंधश्रद्धा न बाळगता, आपण महात्मा फुलेनीं आपल्याला दिलेल्या शिकवणीनुसार आचरण करावे.सर्वत्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाऊस कमी होत आहे. वातावरणावरही परिणाम होत आहे. यामुळे हरित क्रांती करण्याचा प्रयत्न आहे.
विकास शिंदे यांनी सांगितले की माळी महासंघाच्या प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसाला पाच झाडे लावण्याचा संकल्प आहे. समाजातील सर्व पोटजातींना एकसंध बांधून समाजाचे मोठे संघटन उभे करण्यावर पदाधिकारी भर देत आहेत.
यावेळी युवा नेते किरण वाघ, बाळासाहेब झगडे, अक्षय माळी, महादेव शिंदे, वर्षाताई भोंग, सुहास बोराटे, तेजस हेगडे, सुनिल बनसोडे,लक्ष्मण शिंदे,किरण बोराटे, प्रदिप शिंदे, संदीप बारवकर, हरिदास राऊत, सचिन व्यवहारे, अमोल बोराटे, वैभव झगडे, अक्षय झगडे,अजय बोराटे, सोमनाथ रासकर, गणेश सुरेश राऊत, मुकुंद शिंदे, गणेश राऊत, बिभीषण देवकर, दादा शिंदे, अमोल शिंदे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.