दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
अन्नदात शेतकरी राजा आणि त्याच्या डोळ्यातील अश्रू हि विदारक स्थिती कधी तरी कायमची बदलण्याची गरज आहे. माघारी मान्सुन राज्यात सक्रिय झाला आणि पावसाने मर्यादा ओलांडली हाती आलेल सगळं पिक पाण्या सोबत वाहुन जाताना डोळ्यात अश्रु येण स्वभाविक आहे.पण हे विदारक चित्र दृश्य पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रु येतील एवढी बिकट परिस्थिती संकट शेतकरी राजावर ओढावल आहे.रातोरात होत्याच नव्हत झाल.हाती आलेली सोयाबीन डोळ्यांदेखत चिखल होत आहे.फुटलेला कापुस वाती होऊन जाग्यावर उगवत आहे . आणि हातबल बळीराज एका डोळ्यात अश्रु तर दुस-या डोळ्याने पाऊस उघडेल आणि काहीतरी पिक हाती येईल या अपेक्षेने ढगाकडे पाहत आहे.पण दया येईल तो निसर्ग कसला . निसर्ग तर पार कोपलाय सगळीकडे फक्त डोळ्यात अश्रु आणि जमिनीवर पाणी एवढंच दिसतंय. बळीराजाची हालत कठीण झाली आहे. यकधी करोडा दुष्काळ,तर कधी ओला दुष्काळ,पाऊस आला तर प्रचंड आणि बेमौसमी पिक आल तर भाव नाही आणि भाव वाढला तरी हाती पिक नाही , जगात क्षेत्रफाळाच्या दृष्टीने आपला असलेला नंबर आणि आपली कन्या कुमारी पासून हिमालया पर्यंत असणारी शेतजमीन तरी सुद्धा आपण विदेशातुन गहु , सोयाबीन, कांदा, खाद्यतेल, साखर , यांसारखे अनेक शेती आधारीत उत्पादन आपण आयात करतोय, मग आपण काय पिकवतोय याच नेमकं गमक काय आहे . आपल्याकडे जगातील छोट्या छोट्या देशात असणारी सुसुत्रता कधी येणार . मौसमी शेती संकल्पना कधी बंद होईल कि नाही कि असतं शेतकरी आत्महत्या हे सत्र असंच चालू राहिलं.नेमक आपलं गणित कुठं चुकतंय , कधी दुध रस्त्यावर फेकल जात, कधी फळभाज्या, कधी कांदे , बटाटे, टमाटे रस्त्यावर फेकण्याची वेळ येते. म्हणजे आपली समन्वय यंत्रणा किती दुबळी आणि कमजोर आहे हेच या मधून अधोरेखित होतंय. मग आपण शेती प्रधान देशातील असुन बहुसंख्य लोकांच जीवन शेतीअधारीत असताना आजुन निसर्ग पाऊस आणि दुष्काळ याच चक्रव्युहातुन आपण बाहेर पडलो नाहीत तर पिकविलेला माल त्याचा योग्य भाव , आणि गडागडणारे भाव हे सत्र कधी थांबणार आहे . पिकांच नियोजन ,भावाच नियोजन, नैसर्गिक आपत्ती पासून बचाव , एकंदरीत यावर काही दिर्घ कालिन उपाय आपण शोधले आहेत का जगातील इतर देशांना शेती परवडते आपण त्यांच्याकडुन आयात करतो .मग आपल्याच शेतमालाला योग्य भाव का मिळत नाही.रसत्यावर शेत माल फेकण्याची वेळ अन्न दात्यावर येत असेल तर कि हि किती दयनीय अवस्था आहे. फक्त बैठक चर्चा चर्चा सत्र आणि घोषणांचा पाऊस यापालिकडे सत्या पर्यंत आपण कधी पोहचणार आहेत . कधी हाती आलेल सोयाबीन, कापुस, कधी हाती आलेली केळी, कधी हाती आलेली द्रक्ष , कधी तोडणीला आलेला हापुस हाती आलेल भात पिक , किंवा गहु ज्वारी, बाजरी, पावसाचा दरवर्षी तडाखा बसत नाही असं होतं नाही .मग आपली हवामान यंत्रणा, तत्सम शेतीच्या विकासासाठी कार्यरत यंत्रणा या फक्त शोभेच्या वस्तू आहेत का? मग आपण जगाच्या तुलनेत कुठे,छोटे छोटे देश अगदी मराठवाड्या एवढं क्षेञफळ असणारे देश आपल्याला शेतीच्या संदर्भातील पिक निर्यात करत असतील तर हि शोकांतिका आहे असंच म्हणावं लागेल.मग आपलीच अशी दयनीय अवस्था का? आपल्याकडे शेती एकतर निसर्गाच्या भरवशावर पुन्हा बियाण उगवे पर्यंत आणि उगवल्यानंतर पिक येई पर्यंत भरोसा नाही.आणि पिक आल तर पाऊस म्हणजे किती दयनीय अवस्था झाली आहे. उस पिकवला तर आति रिक्त उस समस्या तोडुन बांधावर फेकायची वेळ,मग नेमकं पिकवायच काय, मग कोणत्या शेतात काय, किती पिक घ्यावं याच काही धोरण आहे का शेती जर देशाच्या विकासाचा कणा आहे तर शेतीचा विकास पण झालं पाहिजे ना फक्त बोलाचा भात बोलाची कढी आणि राजकिय पोळी यापलिकडे शेतीचा विकास आणि विचार कोणी करायला तयार नाही . समस्या त्याच आहेत .काल आज उद्या त्याच असतील पण प्रगती तंत्रज्ञान,मग हे सगळं कशाला आहे.शेतीच यांत्रिकी करणं किती झालं कागदोपत्री आकड्यांचा खेळ यापालिकडे सत्यता पण उतरवता आली पाहिजे.आपल्या डोळ्यासमोर किती माणसं आपण गमवायची दुःख वेदना सहन करण्याची त्यांची क्षमता संपण्याच्या अगोदर विधायक मार्ग निघाला पाहिजे.आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात आहेत.शेवटी समस्या हि सगळयांचीच आहे वरवर कडीने मलम लावण्यापेक्षा त्यावर कायमचा उपाय करण्याची आवश्यकता आहे . जेणेकरून बळीराजाला आपल्या कष्टाचं फळ आणि हक्काच्या घामाचा दाम खात्रीने मिळेल.आणि निसर्गासह कोणतही संकट कहिही बिघडवू शकणार नाही.अशा पद्धतीने संरचना आणि बदल करून यंत्रणा कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे.तेव्हाच बळीराजाला स्वाभिमाने उभा रहता येईल.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301