दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
मुंबई–मुंबईसह महाराष्ट्र पोलीस दलातील मे, जून महिन्यात होणाऱ्या बदल्या आणि बढत्या अखेर आक्टोंबर महिना संपत आला तरी बदल्या करण्यात आल्या नाहीत. मात्र आता शिंदे आणि फडवणीस यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांवरून त्यांच्या चांगलाच मतभेद वाढला असल्यांचे सांगण्यात आले आहे. सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी बदल्या रखडल्यांने कॉन्स्टेबल पदापासून ते आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये नाराजीचा सूर आहे काही अनेक वर्ष साइड ब्रचला आहेत. तरी कोणी अन्य अडचणीसाठी विनंती अर्ज केले आहेत. राज्य शासनाकडूंन बदल्या आणि बढत्या बाबत कोणताच हालचाली होताना दिसत नसल्याने पोलिसांच्या कामांमध्ये कोठेच उत्साह दिसत नाही नियमित कामेही वेळेवर होताना दिसत नसल्याचे शिंदे-फडवणीस सरकारने पोलिसांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई असो वा राज्य जिल्हानिहाय पोलिसांच्या बदल्या दरवर्षी ३१ मे. पर्यंत कराव्यात असे निर्देश आहेत. अखेर पर्यंत फार क्वचित परंतु जून महिन्यांत सर्वसाधारण बदल्या होतात.गेल्या वर्षी कोरोनामुळे पोलिसांच्या बदल्या करण्यांत आल्या नव्हत्या. यावर्षी तरी बदलांची शक्यता होती मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ३० जून पर्यंत सर्व प्रकारच्या बदलांना स्थगिती देण्यांत आली होती. त्यानंतर राज्यांत सत्तांतर झाले आणि शिंदे फडवणीस सरकार सत्तेत आले. यानंतर तरी बदल्या होतील अशी अपेक्षा होती मात्र ऑक्टोंबर महिना संपत आला तरी पोलिसांना बदल्या आणि बढत्याची प्रतीक्षाच करावी लागणार मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यांत आले. मात्र पोलिसांच्या बदल्या का करण्यांत येत नाहीत? असा सवाल आता पोलिसांकडूंन उपस्थित केला जात आहे. अनेक आयपीएस अधिकारी आता बदलांच्या आणि बढत्यांच्या प्रतीक्षेतच आहेत.