दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी नाशिक- संभाजी गोसावी.
नाशिक जिल्ह्यांतील निफाड तालुक्यांतील देवगांव गावची पहिली महिला जवान गायत्री विठ्ठल जाधव (वय२३) हिला राजस्थान मधील अलवर येथे दलाचे प्रशिक्षण घेत असताना खड्ड्यात पडून डोक्याला जबर मार लागल्यांमुळे तिचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. गायत्री ही अत्यंत बुद्धिमान आणि जिद्दी असल्यांने आधीपासूनच सैन्य दलात जाण्यांचा तिचा मानस होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्या़तून सैन्यात जाणाऱ्या पहिल्या दोन मुलींमध्ये व निफाड तालुक्यांतुन सैन्यांत जाणारी ती पहिली मुलगी होती. गायत्री जाधव हिच्यांवर गेले तीन महिन्यांपासून रुग्णालयांमध्ये मेंदू शस्त्रक्रिया करण्यांत आली होती. पुन्हा ती ट्रेनिंगला रुजू झाली होती. पण मात्र पुन्हा तिला त्रांस जाणू लागल्यांमुळे रजा घेवुन ती घरी आली होती. मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये तिला उपचारासाठी दाखल केले गेले होते तेथे तीन महिने उपचार घेतल्यानंतर पुन्हा त्रांस जाणू लागल्यांने अधिक उपचारांसाठी दिल्ली येथील एम्सचा संदर्भ देण्यांत आला. मात्र तेथे येण्यापूर्वीच मंगळवारी तिची तब्येत खूपच खालावली गेली व त्यातूनच तिची दृष्टी गेल्यांने तातडीने उपचार म्हणून ग्रामीण रुग्णालयांत दाखल केले. मात्र बुधवारी दुपारच्या सुमारांस दुर्दैवांने गायत्रीचे निधंन झाले. गायत्रीच्या घरचे परिस्थिती अत्यंत हलाखीची असून उपचारांसाठी तब्बल ८ लाख रुपये खर्चही केला होता. राजस्थान मधील अलवर येथे प्रशिक्षण घेणाऱ्या निफाड तालुक्यांतील महिला जवान गायत्री जाधव प्रशिक्षणादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे शहीद झाल्या. गायत्रीच्या जाण्यांमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. संपूर्ण निफाड तालुक्यांसह देवगांव गावामधून हळहळ व्यक्त होत आहे.