दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
▪️बॅनर व फलकबाजीने शहराचे विद्रुपीकरण
▪️लावण्यात आलेल्या बॅनरमुळे वाहतुकीस अडथळा
—————————————-
अमरावती :- अंजनगाव सुर्जी शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनर व फलक बाजी करण्यात येत असून बॅनर लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि ज्या ठिकाणी बॅनर लावण्यात येणार आहे,त्या जागामालकाची कोणतीही परवानगी घेतली जात नाही.त्यामुळे फलक बॅनर लावणाऱ्यांकडून या नियमाचे पालन केले जात नाही.याकडे नगरपरिषद दुर्लक्ष करून परवानगी जर घेतली तर पालिकेत जमा होणारा महसूल बुडवत आहे.हे फलक बॅनर शहरातील महत्त्वाचे चौक,रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर लावण्यात येत असल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे चौका-चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमुळे वाहनधारकांना रस्ता दिसत नसल्याने अपघातही होतात.त्यासाठी अंजनगाव सुर्जी बॅनरमुक्त शहर करायचा निर्णय मुख्याधिकारी घेणार तरी कधी?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.या बॅनर फलकमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.