दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अखंड हिंदुस्थानचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज या थोर राष्ट्रपुरुषासह क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या विरोधात मी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वेळोवेळी गरळ ओकण्याचे जे अश्लाघ्य काम केले आहे ते निश्चितच निषेधार्ह व संतापजनक असेच असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. एवढेच नाही तर राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची महती संपूर्ण जगभर ज्ञात असून ती राज्यपाल या महत्वाच्या पदावर कार्यरत भगतसिंग कोश्यारी यांना ती खरोखरच ठाऊक नसावी, किंवा असे वक्तव्य जाणीवपूर्वक करुन त्यांना अवमानित करणे हा त्यांचा हेतूच होता याचेही स्पष्टीकरण होणे गरजेचे आहे. त्याशिवाय म.ज्योतिबा फुले व त्यांच्या अर्धांगिनी सावित्रीबाई फुले त्यांचे त्याकाळी अल्प वयात झालेल्या लग्नाच्या अनुषंगाने हास्यास्पद अशी टिंगल टवाळी करुन कोश्यारी यांनी राज्यपाल या पदाचीही उंची कमी केल्याचा राग व्यक्त होत आहे. अशा महान महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्रातून तात्काळ उचलबांगडी करावी अशी मागणी सर्वत्र लावून धरली जात आहे. परभणी जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. जागोजागी तीव्र आंदोलने छेडली जात आहेत. कित्येक ठिकाणी तर त्यांचे पुतळेही जाळले जात आहेत.
भगतसिंग कोश्यारी यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने अशाप्रकारचे बेजबाबदार वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सुध्दा आपल्या कटू भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार, अजित पवार, कॉंग्रेसचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचितचे प्रकाश आंबेडकर, ……आदी नेत्यांचा समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कोश्यारी यांनी शिवाजी महाराज जुने पुराने असून तरुणांनी आता नवीन आदर्श शोधले पाहिजेत, असे संतापजनक विधान केले होते. एवढेच नाही तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या नवीन नेत्यांच्या आदर्शाचे अनुकरण केले पाहिजे तद्वतच नितीन गडकरी व शरद पवार यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी थेट शिवाजी महाराज व म. ज्योतिबा फुले यांच्या तुलनेत जे स्थान दिले त्यांचे ते बोलणे वायफळ असेच म्हणावे लागेल.
शिवाजी महाराज यांच्याबद्दल जागतिक स्तरावरील नेत्यांनी जे उद्गार काढले होते, ते खरोखरच आपल्या भारत देशाची शान वाढवणारे होते.
“जर शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परगृहावरही राज्य केले असते !”
–लॉर्ड माउंटन बॅंटन, इंग्लंड.
“भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजांच्या ते लढा !”
–नेताजी सुभाषचंद्र बोस.
“नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर’ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे !”
–ॲडॉल्फ हिटलर.
“शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर शिवाजी महाराज ही आजच्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !”
–स्वामी विवेकानंद.
“जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य संबोधले असते !”
–बराक ओबामा, अमेरिका.
“जर शिवाजी महाराज अजून दहा वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुद्धा पहाता आला नसता !”
–इंग्रज गव्हर्नर.
“काबूल पासून कंदहार पर्यंत माझ्या तैमूर खानदानाने मोगली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्थानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमूर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखले ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुष्मन दिया भी तो कौण दिया ? शिवा_भोसला जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादूर योध्दा और दिलदार दुष्मन तेरे पास आ रहा है !”
–औरंगजेब (छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नमाज पडताना काढलेले उद्गार, संदर्भ- खाफिखानाची बखर)
“उस दिन सिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नहीं काठी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद में भी *सिवा भोसला से मिला नहीं चाहता !”
–शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.
“क्या उस गद्दारे दख्खन हे सिवा नाम का लोहा राने के लिये एक भी मर्द नहीं है, इस दरबार में ? लावत है, ऐसी मर्दानगी पे !”
–बडी बेगम अलि आदिलशाह.
१७ व्या शतकात युरोप खंडात “लंडन गॅझेट” नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरुन सही सलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला होता !
वरील सर्व उदाहरणांवरुन छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणून उल्लेख केला जातो. जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच ! महाराजांनी त्यांच्या ३० वर्षांच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त दोनच भारतीय आणि बाकी सर्वजण परकीय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते !
एवढा सारा महत्वपूर्ण इतिहास शिवाजी महाराजांच्या शौर्याशी जुडीला गेला असूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मात्र त्या सर्व महाराजांच्या इतिहासाचा विसर पडला, यापेक्षा दुर्दैव ते कोणते म्हणायचे ?
भगतसिंग कोश्यारी यांची तात्काळ महाराष्ट्राच्या बाहेर उचलबांगडी करावी म्हणून परभणीत छत्रपती संभाजी राजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. यासंबंधी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी संपर्क साधून शिवाजी महाराजांविषयीचे कोश्यारी यांनी केलेले बाष्कळ वक्तव्य कानी घातल्याचे सांगितले.
मुंबईतील नालासोपारा येथील एका कार्यक्रमात शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज तथा भाजपा खासदार उदयन राजे भोसले यांनी तर चक्क धिंडवडेच काढले. अरे पक्ष भिक्षा गेला खड्ड्यात ! असा संताप व्यक्त करीत त्यांनी कोण हा भिकारडा,
या भिकारड्या हरामखोराची लायकी तरी आहे का ? याला चांगला चोप देऊन महाराष्ट्राच्या बाहेर हाकला असे उद्वीग्न उद्गार त्यांनी काढले.
परभणीत शिवसेनेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात थोडे मारो आंदोलन छेडले; तर राष्ट्रवादीने सुध्दा याच परिसरात कोश्यारी यांचा तीव्र निषेध व्यक्त केला.
तिसऱ्या घटनेत कृषी विद्यापीठ गेटसमोर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला, तर संभाजी सेनेच्या वतीने शिवाजी स्मारक परिसरात भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन छेडले गेले. याच परिसरात दुसऱ्या दिवशी परभणीतील असंख्य शिव प्रेमींनी कोश्यारी यांचा निषेध व्यक्त केला.
शहरातील महात्मा फुले स्मारक परिसरात युवक काँग्रेसच्या वतीने भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला गेला. तर उपोषण मैदानात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर रणेर यांनी सुध्दा कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. याशिवाय शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना पदावरुन तात्काळ हटवा, अशी मागणी परभणीतील शिवप्रेमींनी जिंतूरच्या तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटविले जावे म्हणून थेट देशाच्या राष्ट्र्पतींकडे केले आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड यांनी तर कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन न हटविले गेल्यास त्यांच्या धोरणात आग्या महुळ सोडल्याशिवाय राहाणारे नाही असा सज्जड दमच दिला आहे. तर तिकडे राष्ट्रवादी विद्यार्थी ओबीसी सेलच्या वतीने राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करुन तीव्र आंदोलन छेडले आहे. परभणी शहर व ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी अशा प्रकारची आंदोलने छेडली जात असून तेथे भगतसिंग कोश्यारी यांची उचलबांगडी केली जावी असे तीव्र भावनेतून व्यक्त केले जात आहे.
राज्यात भाजपाचे मिलीजुली तर देशात संपूर्ण भाजपाचे सरकार असल्यामुळे कोश्यारी यांना हटविले जाईल का नाही, ही बाब संशोधनात्मक असली तरी महामहिम राष्ट्रपती महोदया याबाबतीत काय निर्णय घेतील याकडे मात्र सर्वांचेच लक्ष लागून राहिले जाणे स्वाभाविक आहे. एकूणच भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे वादग्रस्त विधान केले आहे, ते अत्यंत निंदनीय असेच म्हणावे लागेल. महामहिम राष्ट्रपती महोदया यांनी तात्काळ या प्रकरणी लक्ष घालून कोश्यारी यांना पदच्यूत केले जावे अशी आशा व्यक्त केली जात आहे.
जनहित याचिका दाखल
“””””””””””””””””””””””””””””””
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ६१ अन्वये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात महाभियोग चालविला जावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. जिचा अनुक्रमांक १९९०९/२०२२ असा आहे.
सदर याचिकेद्वारा भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटवण्याची आणि मागणी केली आहे. राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात भा.दं.वि.१५३, १५३ एक, १२४ (ए) अन्वये कारवाई करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.