दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी – माधव गोटमवाड
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळल्या गेला. पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने बांगलादेशला ऑलआऊट करत सामना 188 धावांनी जिंकला.
वन डे मालिका गमावलेल्या भारतीय संघाने कसोटी मालिकेचा श्रीगणेशा विजयाने केला. यजमान बांगलादेशला त्यांच्याच भूमीत भारताने तब्बल १८८ धावांनी पराभूत केले आणि २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० असा विजय मिळवला.
या विजयात भारतीय संघाचे फिरकीपटू महत्त्वाचे ठरले. पाचव्या दिवसापर्यंत रंगलेल्या या सामन्यात दुसऱ्या डावात अक्षर पटेलने ४ तर कुलदीप यादवने ३ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा (९०) आणि श्रेयस अय्यर (८६) यांनी शतकानजीक जाणारी खेळी केली. पण दोघांचेही शतक हुकले. आर अश्विनने अर्धशतक ठोकले. याशिवाय, रिषभ पंत (४६) आणि कुलदीप यादवने (४०) दमदार खेळी केली. बांगलादेशने प्रत्युत्तरात पहिल्या डावात नांगी टाकली. कुलदीप यादवचे ५ बळी आणि मोहम्मद सिराजचे ३ बळी यांच्या बळावर भारताने बांगलादेशला १५० धावांतच गुंडाळले.
त्यानंतर भारताने फॉलो-ऑन न देता फलंदाजी करायची ठरवली. भारताकडून दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा हे दोन तारे चमकले. शुबमन गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलेच शतक ठोकले. त्याने १० चौकार आणि ३ षटकारांसह ११० धावा केल्या. तर चेतेश्वर पुजाराने वेगवान खेळी केली. त्याने १३ चौकारांच्या साथीने नाबाद १०२ धावा केल्या. भारताने बांगलादेशला ५०० धावांपेक्षा मोठे आव्हान दिले. पण बांगलादेशला ते आव्हान पेलले नाही. त्यांचा दुसरा डाव ३२४ धावांवर आटोपला.
टीम इंडियाने चटोग्राम कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस होता. कालच्या 6 बाद 272 वरुन आज बांग्लादेशने डाव पुढे सुरु केला.
त्यांचे 4 विकेट बाकी होते. आज पाचव्या दिवशी स्कोर बोर्डवर फक्त 52 धावांची भर घालून बांग्लादेशचा डाव आटोपला. टीम इंडियाने बांग्लादेशला विजयासाठी 513 धावांच लक्ष्य दिलं होतं. बांग्लादेशची टीम 324 रन्सवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने 188 धावांनी मोठा विजय मिळवला.
टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात काय झालं?
त्यावर नजर टाकूया. भारताने पहिल्या डावात पुजारा आणि अक्षरच्या अर्धशतकाच्या बळावर 404 धावा केल्या. बांग्लादेशचा पहिला डाव 150 धावात आटोपला. भारताकडून पहिल्या डावात कुलदीपने 5 विकेट घेतल्या. टीम इंडियाने फॉलोऑन न देता पुन्हा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पुजारा आणि गिलच्या शतकाच्या बळावर भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये 258 धावांवर डाव घोषित केला. बांग्लादेशला विजयासाठी 513 धावांच लक्ष्य दिलं. बांग्लादेशची टीम दुसऱ्या इनिंगमध्ये 324 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने 188 धावांनी सामना जिंकला.
अक्षर-कुलदीपचा जलवा !
पाचव्या आणि शेवटच्या दिवशी शाकीब अल हसनकडून संघर्ष केला जाईल याची भारतीयांना कल्पना होती. तसेच घडले. मेहिदी हसन मिराज १३ धावांवर बाद झाला पण शाकीबने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने तब्बल ६ षटकार आणि तितकेच चौकार लगावत १०८ चेंडूत ८६ धावा कुटल्या. कुलदीप यादवने त्याला बाद केल्यानंतर भारताने सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर ताजीउल इस्लाम (४) आणि इबादन हुसेन (०) यांना माघारी घालवत भारताने पहिल्या कसोटीवर १८८ धावांनी कब्जा केला.