दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
नवी दिल्ली : ‘आज देशाच्या मूळ आत्म्याशी खेळ केला जात आहे. प्रत्येकाला द्वेषाच्या विरोधात लढाई लढावी लागेल’ असे आग्रही आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल केले.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केलेल्या भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या (आयएनसी) ३८ व्या स्थापना दिनानिमित्त ते बोलत होते. राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने आमच्यासाठी `संजीवनी`चे काम केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कॉंग्रेस स्थापनादिनानिमित्त पक्षनेत्या सोनिया गांधी व राहूल गांधी यांच्या उपस्थितीत २४-अकबर रस्ता येथील पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात खर्गे यांनी देशातील सद्यस्थितीबाबत भेदक भाष्य केले.