दैनिक चालु वार्ता प्रतनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे ..मंठा..रोजगाराचा
वाणवा असलेल्या ग्रामीण
भागातील मजुरांना मग्रारोहयो ही योजना वरदान ठरली आहे. दुष्काळात या योजनेने शेतकरी शेतमजुरांना मोठा आधार दिला. तंत्रज्ञानाच्या युगात योजना बदलली परंतु काही त्रुटी तशाच राहिल्याने भामट्यांनी ही योजना पोखरून टाकली असल्याच्या घटना उघडकीस येत आहे गावोगावी ‘रोजगार हमी, अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ अशी खिल्ली उडविली जात असल्याने आता योजनेतील घोटाळ्यावर आळा घालण्यासाठी
शासनाकडून एनएमएमएस
(नॅशनल मोबाईल मॉनिटरिंगसिस्टीम) प्रणाली विकसीत करण्यात आली असून या प्रणालीनुसार अॅपच्या माध्यमातून मजूराची हजेरी होणार आहे.
देशात रोजगार हमी योजना
गोरगरीबांसाठी वरदान ठरली
आहे. हाताला काम मिळत
असतानाच काही मध्यस्थी
आपले खिशेही भरीत असल्याचे
अनेकदा पुढे आले आहे.
दरम्यान, केंद्र व राज्य सरकारने या योजनेत मोठी पारदर्शकता आणली आहे. यातून थोडाही घोटाळा होऊ नये यासाठी रो- हयोच्या सार्वजनिक कामांसाठी नॅशनल मोबाइल मॉनिटरिंग सिस्टीम प्रणाली अंमलात आणली आहे. त्यामुळे आता रो- हयोच्या सार्वजनिक कामासाठी या सिस्टीमच्या अॅपवर मजुराची दिवसातून दोन वेळा हजेरी घ्यावी लागणार आहे. अॅपवर मजुराची नोंद नसेल तर त्या कामाचे मस्टरही निघणार नाही. यासाठी मजुराचे आधारलिंकही बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार असल्याचे सांगितले जा- ते. या योजनेसाठी मोठ्या
प्रमाणात निधी मिळतो. या योजनेतून केवळ खिसे भरण्याचे..काम अनेकांनी केल्यामुळे रोजगार हमी योजना बदनाम झाली. त्यामुळे घोटाळे पाहूनच
आता केंद्र व राज्य सरकारने या
योजनेत पारदर्शकता आणून
शेतकरी, शेतमजुरांना आधार देण्याचे काम केले जात आहे. 🎆मजुरी वेळेवर मिळणार
डिजीटल हजेरी सुरु करण्यामागचे कारण म्हणजे यापूर्वी मनरेगाअंतर्गत बनावट खाती तयार केल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे होत्या.
भ्रष्टाचार, योग्य काम न करणे. पैशाचा दुरुपयोग आदी कारणानी ही डिजीटल हजेरी सुरू करण्यात आली असून कामावरील मजूरांना त्यांच्या कामाचा मोबदलाही वेळेत मिळण्यास मदत होणार आहे.)