दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
लवकरच मिळणार आणखी ६८ किमी रस्त्यांच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी
**************************
परभणी : जिल्ह्यांतर्गत रस्त्यांची झालेली दूरावस्था ध्यानी घेऊन परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी लक्ष केंद्रित केले व आपल्या प्रयत्नांने ६३ कि.मी. रस्त्यांसाठी तब्बल ७३ कोटींचा निधी प्राप्त करुन घेण्यात मिळविलेले यश स्पर्हनीय असेच म्हणावे लागेल.
लवकरच पहिल्या टप्प्यातील या विकास कामांना सुरुवात केली जाणार असून त्यानंतरही दुसऱ्या टप्प्यातील ६८ कि.मी. रस्त्याच्या विकासासाठी आणखी कोट्यावधींचा निधी सुध्दा लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी दै.चालू वाल्यांनी बोलतांना दिली आहे.
राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रस्ते विकासाची कामे जोमाने सुरु आहेत. लगतच्या सर्व जिल्ह्यातही बहुतांश रस्त्यांची विकासकामे सुरु असतांनाच संजय जाधव यांना अलिप्त राहून चालणारे नव्हते. किंबहुना त्यासाठीच परभणी जिल्ह्यातल्या तालुके व गावखेडे यांना जोडणारे रस्ते विकासापासून वंचित असल्याने तिकडे आपले लक्ष केंद्रित केले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करुन त्यांनी चालविलेले प्रयत्न सार्थकी लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात ६३ कि.मी. रस्ते विकासासाठी म्हणून ७२ कोटी ९३ लाख एवढा निधी मिळविला आहे. ज्यामुळे जिल्ह्यांत रंगत येणारे तालुके व तालुक्यांत रंगत येणारे गावखेडयां अंतर्गतच्या सर्व रस्त्यांना आता विकासाची झळाळी लाभली जाणार आहे. त्यामुळे लवकरच पायी रहदारी आणि वाहनांना सुध्दा सुखाने प्रवास करता येऊ शकेल.
राज्यात व देशातही विरोधी पक्षांची सरकारे अस्तित्वात आहेत. त्यातच संजय जाधव हे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार म्हणून कार्यरत आहेत. विरोधी पक्षाचे खासदार असलेले संजय जाधव यांना सदरच्या रस्ते विकास कामांसाठी आवश्यक असणारा कोट्यावधींचा हा निधी मिळवण्यासाठी किती आणि कसे पापड ठेवावे लागले असतील, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक परंतु एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून विकासाची ही गंगा त्यांना कांही केल्या परभणीपर्यंत आणणे अत्यंत गरजेची होती अन्यथा तोंडावर आलेल्या निवडणूकीत त्यांना ते किती जिकीरीचे झाले असते हे सर्वश्रुत आहेच. तरीही स्वस्थ न बसता संजय जाधव यांनी जिल्हा अंतर्गत लोकहिताची भावना जोपासतांना जी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली ती अत्यंत जिव्हाळ्याची तर आहेच शिवाय कर्तव्याची जाण म्हणून निस्पर्हनीय अशीच लोकसेवाच म्हणावी लागेल. अर्थात ही सर्व रस्ते विकास कामे पंतप्रधान सडक योजनेअंतर्गतची असली तरी त्यासाठी प्रयत्नशील राहाणे हे गरजेचेच होते. एकूण १८ रस्ते विकास कामांचा दिलेला प्रस्ताव अथक प्रयत्नांतून सफल झाला असून पहिल्या टप्प्यात ९ तर दुसऱ्या टप्प्यात ९ अशा १८ रस्ता विकास कामांना मंजूर मिळवत आपले ध्येय पूर्णत्वास नेले आहे एवढे मात्र खरे.
पहिल्या टप्प्यात ज्या तालुक्यांतील गावे आणि त्या गावांतील रस्त्यांचा विकास केला जाणार आहे, त्याची विगतवारी पुढील प्रमाणे रहाणार आहे. गंगाखेड तालुक्यातील जी दोन गावे यात समाविष्ट आस हेतू त्यात सुपा-बोर्डा-बोर्डा तांडा या ५.०३ किमी कामांसाठी ४१०.४९० कोटी, ढवळकेवाडी-गोदावरी तांडा- कौडगाव रोड या ५.१ किमी साठी ४८४.१५० कोटी, सेलू तालुक्यातील वालूर-राव्हा या ५किमी रस्त्यांसाठी ४६०.९४० कोटी, जिंतूर तालुक्यातील जोगवाडा-पांढरतळा-वरुड-जिंतूर-घेवंडा-खरदडी या ९.६९ किमी रस्त्यांसाठी ८२०.२७० कोटी, आडगाव-खंडागळी-गडदगव्हाण-दिग्रस या १२.९ किमी साठी १,१५४.१७० कोटी, पूर्णा तालुक्यातील गोविंदपूर-गौर-पिंपळगाव लिखा या ४.७२ किमी साठी ३५६.२५४ कोटी, पाथरी तालुक्यातील टाकळी गव्हाण-सारोळा बु. या ३ किमी साठी २४२.७८१ कोटी, मानवत तालुक्यातील मानवत-ओडिआर रोड ६.१३ किमी साठी ५८१.९४० कोटी, सोनपेठ तालुक्यातील थडी उक्कलगाव-गंगा पिंपरी-लोही ग्राम-लोहीग्राम तांडा-शिरसी-सायखेडा-नरवाडी-कोठाळा या १७.६ किमी साठी २,७६२.५०६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
दुसऱ्या टप्प्यातील ६८ किमी रस्त्यांच्या विकासासाचे कामही लवकरच सुरू केले जाणार असून आगामी आठवडाभरात जिल्ह्यातील आणखी ९ कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला जात असल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी दै.चालू वार्ताशी बोलताना दिली आहे. एकूणच खा. जाधव यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यातील एकूण १८ कामांतील रस्त्यांना चांगलीच झळाळी येणार आहे एवढे नक्की. गेली अनेक वर्षे रस्ता विकासापासून वंचित गावांतील जनतेमध्ये कमालीचा आनंद व्यक्त केला जाणे स्वाभाविक आहे. त्याशिवाय खा. संजय जाधव यांचेही आभार मानले जात आहेत.