दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी-लक्ष्मण कांबळे
नांदेड / नांदेड :- महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर नांदेड व
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,बार्टी,पुणे (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) समतादूत प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने महामाता ,त्यागमूर्ती , माता रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम, यामध्ये निबंध स्पर्धा,वकृत्व स्पर्धा इतर व्याख्याने आयोजित करण्यात आले होते.
लहानपणापासूनच नैतिकतेचे आणि नीती मूल्याचे शिक्षण देऊन महामानवांच्या कार्यास मोठी प्रेरणा दिले असून माता रमाबाई यांचे विचार समाजासाठी आज प्रेरक असल्याचे प्रतिपादन बार्टी,समतादूत विनोद पाचंगे यांनी केले तसेच सामाजिक न्याय विभागाचे विविध योजना,बार्टी संस्थेचे विविध योजना बाबत ते महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर येथे माता रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्याते म्हणून प्रबोधन प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले की इथला समाज समृद्ध करण्यात महापुरुषांचे मोठे योगदान असून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि सावित्रीबाई फुले,रमामाता आंबेडकर यांनी ही या कामी मोठे योगदान दिले असून त्यांचे विचार समाजासाठी निश्चितच प्रेरक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर चे मुख्याध्यापक श्री भारत कलवले हे होते. तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षक एन.पी.केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक श्री भारत कलवले म्हणाले की,विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार कळावेत आणि महापुरूषांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावेत यासाठी येणाऱ्या काळात अनेक विचारवंतांना शाळेत बोलावून महापुरुषांच्या विचाराची पेरणी करणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.एन.गुंटूरकर यांनी केले.व
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस.एस.सुंदाळे यांनी केले तर आभार कु. संगीता वडजे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आशीर्वाद गाडे, एच.आर.चव्हाण,ए.व्ही.रामगिरवार,एम. एन.गुंटूरकर,एस.पी.डांगे, अरविंद केंद्रे,डी.एम. केंद्रे, नितीन रानशेवार,चंद्रमणी सोनकांबळे ,शासकीय अध्यापक विद्यालयातील प्रशिक्षणार्थी ऐश्वर्या मुळेकर , सुजाता कांबळे, सुचिता जोगदंड, भाग्यश्री जाधव आदींनी परिश्रम घेतले.