दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
(२५ आणि २६ मार्च २०२३ ला भव्य तिसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न होणार)
=========================
==========================
लातूर/अहमदपूर:- बौद्ध धम्म मानव जातीच्या आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी उपयुक्त असून जगाला युद्धापेक्षा बुद्धाच्या विचाराची अत्यंत आवश्यकता आहे म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतर देशभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम , मेळावे ,बौद्ध साहित्य संमेलन्ने ,धम्म परिषदा होत आहेत त्या अनुषंगाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्धमय भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि धम्म चळवळ गतिमान होण्यासाठी लातूर येथे २५ आणि २६ मार्च २०२३ रोजी संपन्न होत असलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचा निर्धार अहमदपूरकरांनी शनिवार दि १८ फेब्रुवारी२०२३ रोजी संपन्न झालेल्या लातूरच्या धम्म परिषदेच्या अध्यक्षीय मंडळाने आयोजीत केलेल्या संखारा बौद्ध विहार ,गायकवाड कॉलनी अहमदपूर येथील नियोजन बैठकीत केला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते दत्तू मामा कांबळे होते तर अध्यक्षीय मंडळाचे सामाजिक ,धार्मिक चळवळीतील नेते प्रा अनंत लांडगे ,चंद्रकांत दादा चिकटे ,मोहनराव माने ,बसवंतप्पा उबाळे , अशोक कांबळे ,माजी जि प अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे , माजी समाज कल्याण सभापती बालाजी कांबळे , प्रा विजय श्रृंगारे , प्रा डी टी सूर्यवंशी ,बोद्धाचार्य देवदत्त बनसोडे आदि मार्गदर्शक उपस्थित होते
यावेळी उपस्थित मान्यवर मार्गदर्शकाच्या शुभ हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीची पुजा आणि विनम्र अभिवादन करून बैठकीची सुरूवात झाली या बैठकीचे प्रस्ताविक करताना मोहनराव माने म्हणाले की बोधीसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या उपस्थितीत ऐतिहासीक धम्मपरिषद संपन्न होणार असून अतिशय उत्कृष्ठ नियोजन करताना सर्वाचा आदर सन्मान होईल या अखिल भारतीय धम्म परिषदेला जागतिक भिक्कु आणि मार्गदर्शक उपस्थित राहून धम्मदेसना आणि मार्गदर्शन करणार आहेत दोन दिवस उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन ही केले तद्नतर चंद्रकांत चिकटे , बसवंतप्पा उबाळे, द्ताञय बनसोडे, देवदत्त बनसोडे, प्रा अनंत लांडगे यांनी मार्गदर्शन करताना लातूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकजुठीने धम्म चळवळीच्या कार्यासाठी पक्ष , संघटना, बाजूला ठेऊन ऐतिहासिक धम्मपरिषद संपन्न व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत लातूर जिल्हयातील सर्व तालुक्यात बैठक घेऊन धम्म बांधवाना उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहोत चाकूर येथे ही बैठक संपन्न झाल्याचे सांगितले आणि अहमदपूर तालुक्यातील धम्म बांधवानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले यावेळी या आव्हानाला प्रतिसाद देत सामाजिक नेते डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी , पॅथर नेते सुप्रीय बनसोडे, जीवन गायकवाड, सामाजीक नेते भगवान ससाने , रिपाईचे पदमाकर कांबळे , दयानंद वाघमारे, रमेश लेडेगावकर ,रमेश गायकवाड , प्रा बालाजी आचार्य , भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष एम एन क्षिरसागर , धम्मानंद कांबळे , पञकार त्रिशरण मोहगांवकर , विलास चापोलीकर ,भिमराव कांबळे , चंद्रशेखर भालेराव , शेटिबा श्रृंगारे, प्रा गौतम वाघमारे, प्रकाश भालेराव , मनोहर गायकवाड, एन डी राठोड, सुभाष साबळे ,वामनराव साबळे , एम बी वाघमारे , एस एम कांबळे ,पिराजी शिंदे , वाय डी वाघमारे, लक्ष्मण कांबळे, विठ्ठल गायकवाड ,आर जी कांबळे ,अशोक गायकवाड ,प्रा हरिश्चंद्र धसवाडीकर , प्रा रुपसेन कांबळे , डी जी गायकवाड ,सचिन बानाटे , प्रकाश रायबोले, आदिनी आश्वासित करत अहमदपूर तालुक्यातून ऐतिहासीक अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार केला या बैठकीच्या यशस्वीतेसाठी प्रा बालाजी आचार्य , मनोहर गायकवाड, एम एन क्षिरसागर, भगवान ससाने यांनी परिश्रम घेतले सुञसंचालन प्रा बालाजी आचार्य यांनी केले तर शेवटी आभार एम एन क्षिरसागर यांनी मानले