दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -ज्ञानेश्वर साळूके
दि. २०/ २ /२०२३
कापसाचा भाव वाढेल या अपेक्षेने फेब्रुवारी अखेरही कधि नव्हे तो अजुनही ७५/८० टक्केच्या पुढे शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन दाबून ठेवलेला आहे. गेल्या २ वर्षापासून अनुक्रमे ४५ते५० लक्ष कापसाच्या गाठी विदेशात निर्यात झाल्या होत्या परिणामी गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांना नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल/मे २०२२ पर्यंत ८ ते १४ हजारापर्यंत फडतर कापसाला देखील भाव मिळाला होता; पण यावर्षी व्यापारी व कॉटन लॉबीच्या दबावाखाली केंद्र सरकारने निर्यातंदी करून, आॕस्ट्रेलियातून विना आयातशुल्क ५१ हजार टन कापूस गाठी आयात करून, निर्यात बंदी केली आहे.तसेच सोयाबीन , मका, हरबरा, कांदा, तुरीसह सर्व शेतमालाचे शेतकरी विरोधी आयात/निर्यात धोरणांमुळे दिवसेंदिवस घसरणारे भावामुळे शेतकरी दिवसेंदिवस हताश होत आहे. या मागणीसह सोयाबीन,तुर,मका, हरबरा नाफेड मार्फत खरेदी करणे, आॕक्टोंबर मधे राज्य सरकारने घोषित केलेले ओल्या दुष्काळाचे अनुदान खात्यावर जमा करणे, वीजतोडणी बंद करून दिवसा मोफत अखंडीत विजपुरवठा करणे, २०२१/२२ ते २०२२/२३ चा पिकविमा अदा करणे, खतांच्या वाढलेल्या कींमती नियंत्रित करणे, इत्यादी सर्व मागण्यांसह कापुस,सोयाबीनच्या दरवाढीला कारणीभूत ठरलेल्या चुकीच्या शेतकरी विरोधी आयात,निर्यात धोरणां विरोधात प्रहार शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख विदुर लाघडे यांच्या प्रमुख उपस्थितीत
आज दि. २० फेब्रुवारी २०२३ सोमवार रोजी महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ जालना , अंबड राष्ट्रीय महामार्गावर पारनेर/दर्गा फाटा येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम बोंबाबोंब रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष राम ठाकूर, सारंगपुरचे सरपंच अमोल काकडे,महादेव थुटे,गजुभैया जऱ्हाड, राजेंद्र गायकवाड,भाग्यश्री शिंदे,शुभंम शिंदे,राजांबर मते, रामेश्वर चव्हाण,मनोहर तार्डे,पांडुरंग तारडे, दिनेश शेळके, सुभाष पवार,भगवान माने,विष्णू वैद्य,संजय भोजने,रंजीत जाधव,पांडुरंग कुंडकर,चत्रभुज टापरे,संभाजी शिंदे,माणीक भोजने,रमेश जाधव,तान्हाजी भोजने,संदिप भोजने,भगवान पवार,योगेश कांगडे, कृष्णा मुळक, गजानन दौंड,अमोल चव्हाण , गणेश ठाकूर,नरेश वाढेकर,दादाराव बकाल, प्रदिप ढवळे,नाथाभाऊ चव्हाण, ज्ञानेश्वर नागरे, एकनाथ कोरडे,बाबासाहेब जिगे,नारायण चव्हाण,ज्ञानेश्वर गायकवाड, शिद्धु कचरे,विष्णू मिसाळ,लक्ष्मण बागडे,उत्तम पांढरे,भगवान शेळके इत्यादी कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने बोंबाबोंब आंदीलनात सहभाग घेतला आहे.