दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी -श्री,रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;+;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा लगत असलेल्या मौजा सुभाषनगर(लोकरवाडी)या गावामध्ये मागील अनेक दिवसापासून किडनी आजाराने अनेक नागरिक त्रस्त असून, या आजाराने अनेकांचा बळी सुध्दा गेलेला आहे,अंदाजे १५०० जवळपास लोकसंख्या असलेल्या सुभाषनगर या गावामध्ये मागील अनेक वर्षापासून गावातील नागरिकांना किडनी आजाराने ग्रासले असून,सन १९९२ पासून आतापर्यंत अंदाजे ४० रुग्णांच्यावर किडनी आजाराने या गावातील नागरिकांचा मृत्यू झाले असल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे,या गावांमध्ये आज रोजी अंदाजे १२ रुग्ण किडनी आजाराने ग्रस्त असुन,त्यापैकी काही रुग्णांना नागपूर येथे उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती चांगली असून,अजुनही ४ रुग्ण या आजाराशी झगडत आहे,तर एक जण डायलिसेसवर आहे,जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून अनेकदा या गावातील पिण्याच्या पाण्याची तपासणी केली असून,पाणी तपासणी अहवालामध्ये या गावातील पिण्याचे पाणी काही प्रमाणात दुषीत असल्याचे पाणी तपासणी अहवालामध्ये निदर्शनास आल्याचे काही नागरिकाकडून सांगण्यात येत आहे,गाव अतिशय गरीब असून,आतापर्यंत या किडनी आजारावर उपचार करताना या गावातील गोरगरीब रुग्णांचे अनेक रुपये खर्च झाले आहे,या गावातील किडनीग्रस्त रुग्णांना या आजारावर होणारा खर्च परवडणार नसल्याने शासनाने या रुग्णांना आर्थिक मदत करावी अशी ही मागणी या गावातील किडनीग्रस्त रुग्णांनी केली आहे, गावातील पिण्याचे पाणी शुद्ध नसल्याने कीडनी आजार जडला असल्याची गावातील नागरिकाकडून ऐकायला मिळत आहे,पाण्याला जीवन असे म्हटले जाते मात्र इथे पाण्यानेच अनेकांचा जीव घेतलेला आहे,विशेषता किडनी आजाराने खूप कमी वयाच्या लोकांचे मृत्यू झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत,या गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी शुद्ध करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असून,मागील चार वर्षापासून गावामध्ये वॉटर फिल्टरची व्यवस्था केलेली असुन, वाटर फिल्टर द्वारे गावाला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात आहे.मात्र गावातील मोजकेच नागरिक या वाटर फिल्टरचा वापर करत असल्याने अजून कीडनी आजार बाळगण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे,प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घ्यावी अशी मागणी या गावातील ग्रामस्थांनी केली आहे.