दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
*****************************
आर्णी तालुक्यातील येत असलेल्या सावळी सदोबा परिसरातील अतिदुर्ग व आदिवासी बहुल परिसर म्हणून ओळखलेल्या सावळी सदोबा परिसरातील सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावे,अशी मागणी अनेक दिवसापासून सावळी सदोबा परिसरातील नागरिकाकडून होत आहेत,सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांवर वेळेवर योग्य उपचार होऊ न शकल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ ठिकाणी पाठविण्यात येत आहे,हा परिसर अतिशय दुर्गम डोंगराळ तथा जंगलव्याप्त परिसर असल्याने या परिसरातील नागरिकांवर अनेक वेळा जंगली वन्यप्राणी अस्वल,वाघ,रानडुक्कर यांचा हल्ला होत असून या हल्ल्यात गंभीर झालेल्या रुग्णांना वेळेवर रुग्णसेवा मिळत नसल्याने त्यांना प्राणास मुखावे लागत आहे,मागील आठवड्यामध्ये वन्यप्राणी राणडुक्कराने हल्ला केलेल्या कुणाला प्राथमिक आरोग्य केंद्रामधून यवतमाळ येथे उपचारासाठी नेत असताना मदातच त्यांचा मृत्यू झाला,अशा रुग्णांवर तात्काळ उपचार व्हावा,अशी मागणी करत शहीद पत्नी कुन्तीताई आडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना या संदर्भात लेखी निवेदन दिले आहे,सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतरित व्हावे अशी मागणी मागील अनेक वर्षापासून सुरू आहेत,मात्र संबंधित विभागाच्या वरिष्ठाकडून दुर्लक्षित केले जात आहे, सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ग्रामीण रुग्णालयात रूपांतर बाबत प्रस्ताव तयार करून त्वरित सादर करावा अशी मागणी होत,आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा ही मोठी बाजारपेठ असल्याने,तथा सावळी सदोबा हे मध्यवर्ती ठिकाणी आहेत,परिसरातील 42 खेड्यांचा संपर्क येतो,येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेहमीच रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात गर्दी असते,त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात झाल्यास येथील रुग्णांवर त्वरित उपचार केल्या जाणार आहेत,त्यामुळे परिसरातील गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे अशा मागणीचे निवेदन शहीद पत्नी कुन्तीताई आडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.