दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम: -केंद्र व राज्य शासनाच्या पत्रकानुसार राज्य परिवहन महामंडळाने एसटी बस मार्गाचे फलक उस्मानाबाद ऐवजी धाराशिव आणि औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असे करण्यात यावे या मागणीचे लेखी निवेदन भारतीय जनता पार्टी भूम तालुका पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांना दिले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव या नामांतराचा प्रस्ताव राज्याचे शिवसेना मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व भाजपचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने ठराव घेऊन मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवला होता.
या प्रस्तावाला देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी , केंद्रीय गृहमंत्री मा. अमितजी शहा यांनी मंजुरी दिली आहे. सदरच्या नामांतराचा केंद्र शासनाने व राज्य शासनाने गेल्या 35 वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल भूम शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने केंद्र व राज्य शासनाचे जाहीर आभार मानले आहेत . हा नामांतराचा निर्णय एक प्रकारे ऐतिहासिक मानला जात आहे.
या नामांतराचे राज्यातील सर्वच पक्षाच्या प्रमुख नेते मंडळीनी सुद्धा स्वागत केले आहे. करिता राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसचे उस्मानाबादचे फलक धाराशिव करण्यात यावे व औरंगाबादचे फलक छत्रपती संभाजीनगर नाव बदलाची अमलबजावणी करण्यात यावी या मागणीचे लेखी निवेदन भूमचे आगार प्रमुख विनोद फुलचंद आलकुंडे यांना देण्यात आले.
या मागणीचे निवेदन शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी भूमचे आगार प्रमुख विनोद फुलचंद अलकुंडे यांना देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ता. अध्यक्ष महादेव वडेकर, भाजपा जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष संभाजी साठे, ता. सरचिटणीस संतोष सुपेकर, मा. नगर सेवक रोहन जाधव, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब विर, युवा ता. अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, अल्पसंख्यांक ता. अध्यक्ष महेबूब शेख, शहराध्यक्ष शंकर खामकर, शहर सरचिटणीस हेमंत देशमुख, शहर उपाध्यक्ष सचिन बारगजे, ता. महिला मोर्च्या अध्यक्ष सौ. लता गोरे , युवा ता. सरचिटणीस सचिन मस्के , श्रीपाद देशमुख, युवा नेते मुकुंद वाघमारे ज्येष्ठ कार्यकर्ते अभिमन्यू गंगाधर महाडिक हाडोंगरी यांच्या या निवेदनावर सह्या असून असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.