दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
शेतकऱ्यांना यावर्षीचा प्रधानमंत्री पिकविमा त्वरित द्यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांनी शेती करत असताना प्रचंड मेहनत केलेली असते पण निसर्गाच्या अवकृपेमुळे अति पाऊस किंवा कोरडा दुष्काळाने काढणीला आलेले पिकाचे प्रचंड नुकसान होते व शेतकरी हतबल होतो त्यासाठी सरकारने पिकांचा विमा काढणे चालु केली लाखो शेतकऱ्यांनी पिकविमा भरला पण आत्तापर्यंत नुकसान गृस्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम विमा रक्कम,पुर्ण विमा मिळायला पाहिजे होता तो युनायटेड इंडिया इन्सुरन्स कंपनीने अद्याप दिला नाही आठ दिवसांत विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा न केल्यास संभाजी ब्रिगेड च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉ विद्या पाटील, संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप गुबरे,मोहन शिंदे, कमलेश कदम, हरिभाऊ भोसले, अशोक कदम, अंकुश कोल्हे,ज्ञानबा कदम, बालाजी मुळे, स्वप्नील शिंदे, सारंग मिराशे, संतोष आसर्जनकर, प्रेमानंद पिंपरीकर गोपीनाथ भोसले संभाजी भोसले यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.