दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या सुवर्ण रत्न पत्रकारिता पुरस्काराने येथील दै.सामनाचे तालुका प्रतिनिधी रमाकांत पाटील नुकतेच सन्मानित झाले आहेत.
संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना वतीने गेल्या काही वर्षापासुन पुरस्कार देऊन गौरविण्यात येते या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असलेल्या दै.सामनाचे प्रतिनिधी रमाकांत पाटील यांना त्यांच्या उत्कृष्ट आणि सामान्यांना न्याय देणाऱ्या वृत्ताची दखल घेत पुरस्कार देऊन आंतरराष्ट्रीय किर्तीचे पखवाजवादक उद्धव बापू आपेगांवकर, प्रबोधनकार अविनाश भारती,
गट शिक्षणाधिकारी शेख चाँद, जयभारती प्रतिष्ठानचे माधव जाधव, योगेश्वरी औद्योगिक वसाहत संस्थेचे पदाधिकारी विशाल जाजू नशिराबाद चे मुख्याधिकारी रवि सोनवणे,जेष्ठ साहित्यिक दगडू लोमटे, सकल्प विद्या प्रतिष्ठान चे सचिव कैलास चोले, मुख्याध्यापिका रेखा बडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले पवन गिरवलकर, गणेश कदम,ज्योती शिंदे आदींनाही यावेळी गौरविण्यात आले.
रमाकांत पाटील यांना यापुर्वीहीअनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेतआपल्या ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या दै. सामनातील प्रारंभापासूनच्या धारदार लेखणीच्या माध्यमातून पाटील यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले असून त्यांना प्राप्त झालेल्या सुवर्णरत्न पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.