दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी- शहाबाज मुजावर.
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावरून सव्वा चार महिन्यानंतर सिद्धीचा वेडा फोडून ज्या मार्गे विशाळगडाकडे रवाना झाले. तो ऐतिहासिक दोन फुटाचा चोर मार्ग झाला 25 फुटाचा. भारतीय दलित महासंघ यांच्या वतीने निवेदन.दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.
किल्ले संवर्धन साठी अनेक संघटना, गडावरचे नागरिक सर्व स्तरावर आंदोलन मोर्चे काढत आहेत. याच मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज 12 जुलै 1660 ला विशाळगडाकडे रवाना झालेत .पुढे पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू नी खिंड लढवली याच आठवणीत आजही शिवभक्त,इतिहास प्रेमी.हजारो लोक पन्हाळा गडावरून विशाळगडाकडे चालत जात असतात. त्यातच वन विभागाकडून अवैध्य बेकायदेशीर रित्या राजदडी मार्ग पंचवीस फुटाचा केला आहे.त्यामुळे तटबंदीचा असणारा जांभा दगड रस्ता मोठा केल्यामुळे जांबा दगड तडबंदीचा खाली येत आहे. तटबंदीला धोका निर्माण होत आहे. ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच आता या ऐतिहासिक राजदिंडी मार्गातून वाहतूक बेकायदेशीर सुरू आहे.ट्रक,ट्रॅक्टर ,दोन, चाकी ,वाहन इथून जात आहेत. राजदिंडी मार्गावरील तडबंदी कुमकुत होऊन हळूहळू ढासळत आहे
त्याचप्रमाणे वनजीव प्राण्यांचा अधिवास व नैसर्गिक साधन संपत्तींना धोका निर्माण झाला आहे. ऐतिहासिक वारसा नष्ट होत आहे. छत्रपती शिवरायांची विशाळगड यशस्वी पारायरन सदरच्या राजधानी मार्गातूनच केले होते. राजधानी मार्ग शिवरायांच्या मावळ्यांच्या इतिहासाची साक्षीदार आहे. हा मार्ग दोन फुट पूर्वी होता. पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेला व भारतीय पुरातत्व विभागाला हाताशी धरून वन विभागाने अधिनियम तोडून 20 ते 25 फुटावर रस्ता केल्या आहे. त्या ठिकाणी खाली बेकायदेशीर नियमबाह्य विश्राम गृह आहे.सदरचा प्रश्न अतिशय संवेदन असून कायदा व सुव्यवस्था बिगडवनारा आहे. ऐतिहासिक तटबंदी राजधानी मार्ग ला धोका निर्माण करणार आहे.
वन विभागाच्या प्रशासन संवेदनशील प्रश्नाचे गांभीर ने दखल घेऊन होणारी वाहतूक तत्काळ बंद करावी. अन्यथा वन विभागात प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा निषेध करण्यासाठी वनविभाग कार्यालय पन्हाळा समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रीकांत कांबळे (आप्पा )यांनी दिला आहे. निवेदनावर अक्षय सोरटे, पवन राऊत, दिपक बानकर,सुरेश पाटील, इत्यादींच्या सह्या आहेत.