दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी: आज घडीला देशात जात,धर्म आणि रंग यावरून देश पेटतो की काय? देशाचे तुकडे होईल काय अशी परिस्थिती आज देशामध्ये पाहायला मिळते आहे मात्र आष्टी शहराची धार्मिक एकात्मता आज देशात एक उत्तम उदाहरण आहे हिंदू,मुस्लिम,शीख,इसाई या देशात एकत्र नांदले पाहिजे जो पर्यंत हे चित्र देशात निर्माण होणार नाही तोपर्यंत या देश महासत्ता होणार नाही असे एकात्मतेला प्रेरणा देणारे मत काँग्रेसचे माजी आ.अमर काळे यांनी हजरत पीर बायजीद बोस्तानमी रहेमतल्लाह अलैह उर्फ टेकडीवाले बाबा येथील सर्वधर्मीय सामूहिक विवाह प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आपले मत व्यक्त केले तत्पूर्वी आ.काळे यांनी टेकडीवाले बाबा यांना चादर चढवत आशीर्वाद मागितले व मंचावर उपस्थित झाले यावेळी मंचावर आष्टी न.पं.अध्यक्ष अनिल धोत्रे, उपनगराध्यक्ष जाकीर हुसेन,उर्स कमेटी अध्यक्ष शेख बशीर, मुन्ना बाबा(आर्वी)भाजप पदाधिकारी जय बेलखेडे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते से.नि.प्रा.अरुण बाजारे,काँग्रेस तालुकाध्यक्ष रवीं आप्पा गंजीवाले,भाजपा तालुका अध्यक्ष कमलाकर निंभोरकर,चर्मोद्योग महा.माजी अध्यक्ष अशोक
विजयकर,पो.निरीक्षक लक्ष्मण लोकरे, नवीन आष्टी ग्रा.पं. सरपंच अपर्णा देशमुख, ग्रा.पं. पेठ अहेमदपूर सरपंच शेख युसुफ, बांधकाम सभापती न.पं. गौजदार खा याकूब खा, मुमताज अहेमद,अता खान,राजेश ठाकरे आदी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना माजी आ. भारत देशाची लोकसंख्या १४० कोटीच्या घरात असून त्यासाठी हम दो हमारा एक अशी कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आणण्याची गरज असून नवजोडप्यानी समजूतदारपणा घेवून नवजीवनाची वाटचाल करणे महत्वाचे असल्याचे म्हटले आहे यावेळी अशोक विजयकर, सरपंच अपर्णा देशमुख, नगर उपाध्यक्ष जनाब जाकीर हुसेन, कमलाकर निंभोरकर, नगराध्यक्ष अनिल धोत्रे, पो. निरीक्षक लक्ष्मण लोकरे, राजेश ठाकरे, सरपंच शेख युसुफ,जय बेलखेडे यांनी सदर मंचावरून मनोगत व्यक्त केले या प्रसंगी एकूण १० जोडप्यांचा विवाह सोहळा साजरा झाला त्यात १ मुस्लिम तर ९ हिंदू जोडप्याचा विवाह पार पडला यावेळी नवविवाहितांना आयोजकाकडून भेटवस्तू देण्यात आल्या मुस्लिम विवाह जमालुद्दीन रिजवी यांनी तर हिंदू जोडप्याचा विवाह शुभम टिपले,डांगे महाराज यांनी मंगलाष्टके म्हणत पार पाडला कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत मनमोहक सुमधुर धून दीपक शिंदे यांनी बासरी वाजवून सत्यम शिवम सुंदरम गाण्याने सुरुवात केली वऱ्हाडी व पाहुणे मंडळीची यावेळी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती या दिमाखदार सामूहिक सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक से.नि.प्रा.अरुण बाजारे यांनी तर संचालन व आभार अवेज खान यांनी केले