दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:खानापूर गावठाण पुनर्वसन येथे मारजवाडी भासवाडी या गावातील नागरिक वास्तव्यास असून आजतागायत या ठिकाणी कसल्याच प्रकारची सोय नसल्यामुळे जिव मुठीत ठेवून आपल्या संसाराचा गाडा पुढे नेत आहेत. या भागातील नागरिकांना ना विजेची सोय आहे, ना पाण्याची सोय आहे,ना घरासमोर नाली आहे अशा अनेक अडचणी असून सुद्धा या भागातील प्रशासन मात्र गांभीर्याने विचार करीत नाही
तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार २४ नागरी सुविधा असताना इ. सन १९९६ पासून आजपर्यंत कसल्याच प्रकारची सुविधा याठिकाणी उपलब्ध नाही. याठिकाणी रात्रीच्या वेळेस विषारी सापजिव जंतू आढळून येतात व यापासून काही अनर्थ घडला तर याला जिम्मेदार कोण ? प्रशासन याची जबाबदारी घेईल का? केले आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत व त्याचबरोबर या भुखंडातून ३३ के व्ही विद्यूत पुरवठा गेलेली असल्यामुळे याला याठिकाणाहून काढून बाजूला सोय करण्यात यावे. या विद्यूत पुरवठ्यामुळे अनेक नागरिकांना याचा त्रास होत आहे व यदाकदाचित या विद्यूत प्रवाहातून काही जिवीतीहानीझाल्यास या प्रकाराला संबंधित कार्यालय जबाबदार राहिल असेही यावेळी निवेदनात नमूद
तरी आमच्या मागण्यांची तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा खानापूर गावठाण पुनर्वसनातील रहिवाशी इसाक इस्माईल माली पाटील रावणगावकर, जैनोदिन पटेल रावनगावकर, वहिद मारवाडीकर यांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे.