दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना: मोबदला न देता शेगाव-पंढरपुर दिंडी मार्गास जमीन संपादित करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांविरोधात संतप्त शेतकऱ्याने मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केल्याचा प्रकार समोर आला आहे. महामार्गासाठी राजपत्रात दर्शविण्यात आलेल्या संपादित जमिनीचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी यावेळी या शेतकऱ्यांनी केली. सध्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा होत आहे.
याबाबतीत अधिक माहिती अशी की, परतूर तालुक्यातील श्रीष्टी गावातील शेतकऱ्याच्या जमिनीतून जाणाऱ्या शेगाव-पंढरपुर राष्ट्रीय दिंडी महामार्गाच्या भु-संपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत आंदोलनास सुरवात केली आहे. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी फेर मोजणीचे नाटक करून मोबदला कमी केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला.
राष्ट्रीय महामार्गासाठी भूमिअभिलेख कार्यालय मार्फत करण्यात आलेल्या स्थळ पाहणी त्यानुसार राजपत्रामध्ये शेतकऱ्याच्या संपादित होणाऱ्या जमिनीचे क्षेत्र हे एक हेक्टर 27 आर दर्शविण्यात आले. मात्र प्रत्येक्षात अधिकाऱ्यांनी फेरमोजनीच नाटक करून हे क्षेत्र 59.9 आर असल्याचं दाखवलं व त्या साठी शेतकऱ्यांना मोबदला म्हणून 2 कोटी 36 लाख 60 हजार 336 ठरवण्यात आला.
त्यात ही अधिकाऱ्यांनी नाटक करून प्रत्यक्षात मोबदला म्हणून 55 लाख 69 हजार 276 ठरवल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले. त्यामुळेच शेतकऱ्यांनी भु-संपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना जोरदार विरोध केला. यावेळी राजपत्रानुसार संपादित जमिनीचा मोबदला द्यावा,नसता राजपत्रात सुधारित क्षेत्रावर बदल करून अगोदर ठरलेल्या दरा प्रमाणे तात्काळ मोबदला द्यावा अशी मागणी करत भु-संपादनास विरोध दर्शवित आंदोलनास सुरवात केल्याने एकच खबळ उडाली आहे.