दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना ( प्रतिनिधी) : जालना नगरपरिषदेने बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या व्यापारी गाळ्यांच्या करांमध्ये केलेली करवाढ व्यापाऱ्यांना मान्य नसून कर भरण्यास व्यापारी वर्गाने नकार दिल्यानंतर व्यापारी विरुद्ध प्रशासन असा वाद निर्माण झाला होता. व्यापारी महासंघाने शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची भेट घेतल्यानंतर श्री .खोतकर यांनी शुक्रवारी ( ता.07) नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन आणि व्यापारी बांधवांची संयुक्त बैठक घेऊन या वादात यशस्वी तोडगा काढला असून व्यापारी गाळ्यांच्या मालमत्तांचे करांबाबत फेर मूल्यांकन केले जाईल ,असा निर्णय घेण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात अर्जुनराव खोतकर यांनी घेतलेल्या बैठकीत व्यापारी बांधवांनी
जालना नगरपरिषदेने या पुर्वी साडेतीन पटीने केलेली जाचक करवाढ अन्यायकारक असून कर भरणार नसल्याचा पावित्रा घेतला. अर्जुनराव खोतकर यांनी बाजार समितीच्या गाळ्यांत शेतकऱ्यांचा माल येत असून तो साठवला जातोय त्यासाठी लागणाऱ्या जागेचे कर घेऊ नये असे सांगून, मालमत्तांचे पुर्नमुल्यांकन करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून मंजुरी मिळवून देऊ, असे वचन दिले. प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने व्यापारी बांधवांनी समाधान व्यक्त केले. बैठकीस नगरपालिकेचे प्रशासक संदीप सानप, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, केशव कानपुडे, बाजार समिती चे प्रशासक पी. बी. वरखडे, सचिव रजनीकांत इंगळे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत साहनी ,महासचिव संजय दाड, संघटन प्रमुख राजेश राऊत, इंदरचंद तवरावाला, सचिव शाम लोया,कार्याध्यक्ष गोवर्धन अग्रवाल,मेघराज चौधरी,हेमंत ठक्कर, रितेश कामड,संजय देठे, सहसचिव मनोज पाचफुले, अर्जुन गेही ,अडतिया असोसिएशन चे अध्यक्ष ओमप्रकाश मंत्री, अनिल सोनी, सचिव विरेंद्र रूणवाल, रमेश तोतला, निवृत्ती राव पाचफुले , बंकटलाल खंडेलवाल,हुकुमचंद पाटणी ,अरुण लाहोटी,अजित छाबडा, अजय अग्रवाल ,संजय लुणावत, हरेश केनिया ,परेश ठक्कर ,आनंद सेठीया,संजय कानडे, राजेश भंडारी, सुरेश वाबळे,जितेंद्र संचेती, प्रवीण कुचेरिया, सुमित पवार ,ज्ञानेश्वर पवार ,ईश्वर बिल्होरे, रमेश सावजी,सुदर्शन भुंबर,साहिल कुरेशी, भरत तनपुरे, अनिल ठक्कर, संतोष खंडेलवाल, सोमेश बंदूकवाला, सुशील गौड, राजेश रुणवाल ,नंदकिशोर अग्रवाल, गोविंद सराटे, बालमुकूंद अग्रवाल, अजय बाविशी,अनिल ठक्कर, यांच्यासह व्यापारी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
____________________________.
____________________________