दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
” लातूर जिल्ह्यात पूर्वीपेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अधिक सक्षमपणे कार्यरत असेल. स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा इतर निवडणुका सामाजिक , राजकीय कार्यातून ठाकरे गटाचे वर्चस्व सर्व शक्तीनिशी दाखवू. ठाकरे गट हा नांदेड ,परभणी आणि लातूर यातून सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.” असे प्रतिपादन नवनियुक्त लातूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण त्यांनी सत्काराला उत्तर देताना आश्वासित केले.
लातुर जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा लोहा येथे सत्कार आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा रंगकर्मी शेषराव कहाळेकर, शिक्षक नेते विठ्ठल पाटील चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नवनाथ बापू चव्हाण , दैनिक चालु वार्ता नांदेडचे उपसंपादक गोविंद पाटील पवार राहुल ससाने सतिश पा चितळीकर प्रताप वाकडे व्यंकटेश वाघमारे शिव पा काकडे सह युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लातूर जिल्हा संपर्क पदी श्री चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले. यावेळी नांदेड लातूर येथून शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘ कैलास ‘ संपर्क कार्यालयात सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी लातुर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण यांचा सत्कार करताना शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, नगरसेवक संदीप चौधरी, उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, तालुका सहसचिव पद्माकर पेंढारकर, शिवसैनिक बालाजी काळे यांची उपस्थिती होती.
माजी आमदार रोहिदास चव्हाण हे यावेळी अत्यंत भावनिक झाले होते त्यांनी सन ऐंशीच्या दशकातील शिवसेनेची गरुडभरारी विशद केली. श्री चव्हाण बोलताना पुढे म्हणाले,” सर्व स्थानिक स्वराज्य संस्था एक हाती ताब्यात घेऊन सामान्य नागरिक व शिवसैनिकांना न्याय दिला. त्या नांदेड जिल्ह्यात दीड हजारच्या जवळपास शाखा स्थापन करून काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावला. सत्ताधार्यांना सळो की पळो करून सोडले. काळातील आठवणी ताज्या करत भविष्यात लातूर जिल्हा भगवा करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे.
त्यावेळी अशोक केंद्रे, ज्ञानोबा पवार , लक्ष्मण चव्हाण, बापु गायकर , संजय कहाळेकर, शिवराज पाटील पवार शिवराज दाढेल आदींची उपस्थिती होती.