दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी:-किरण गजभारे
……………………………….
संपूर्ण जगात श्रेष्ठ ठरलेली भारतीय लोकशाही आपल्या सर्वांना फक्त आणी फक्त भारतीय संविधनामुळे मिळाली असून सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी संविधान आहे.अगदी अलीकडच्या काळातील राजकीय पटलावर वेगवेगळी व अनपेक्षित घटना घडामोडी घडत आहेत आणि त्यातून एक अनामिक भीती निर्माण केली जात आहे ती म्हणजे पुन्हा एकदा हुकूमशाही कडे वाटचाल हे खरे किंवा खोटे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही बाब अतिशय चिंताजनक असून बोटावर मोजण्या इतक्याच राजकीय लोकांच्या स्वार्थी हव्यासापोठी जर खरोखरच संविधानाला धक्का दिला जात असेल तर सर्वांनी वेळेच्या पूर्वीच जागृत होऊ अशा अपप्रवृतीना वेळीच हाणून पाडण्यासाठी एकवटने गरजेचं आहे. भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ असून ते टिकवुन ठेवणे काळाची गरज बनली आहे.
मागील काही वर्षांपासून राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत . लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला फक्त एकाच माताचा अधिकार आहे त्यामूळे आपले मत अमूल्य आहे.त्याचा अपव्यय होणार नाही याची खबरदारी प्रत्येकानेच घेणे आवश्यक आहे. गोरगरीब जनता विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पूर्वी राजकीय नियोजन ठरत असे पण आता या क्षेत्रात भांडवलदार लोकांचा शिरकाव झाला असल्याने कधीही कुणालाही आमिष दाखवून फोडल्या जाते व अपेक्षित असलेले राजकीय डावपेच आखले जातात हा प्रकार म्हणजे जनतेच्या जनमताचा एक प्रकारे अनादर तर नाही का असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्मान होतो पण शिकलेली मंडळी संघटित होत नाही, संघटित झाले तर संघर्षा पर्यंत आपली एकजूट कायम राहत नाही त्यामुळे भांडवलदार लोकांकडून लोकशाहीची नीतिमूल्ये तोडल्या जात आहेत हे बाब प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते. ईतिहास साक्षीला आहे शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या त्रिसूत्री अवलंब केल्याशिवाय सहजा सहजी काहीही मिळाले नाही पण आपण या त्रिसूत्री ब्रह्मास्त्रापासून का दुरावलो यावर चिंतन व मंथन होणे आज गरजेचे बनले आहे.
अलीकडच्या काळात प्रसार माध्यमात संविधान संदर्भात वेगवेगळ्या बातम्या प्रसारित होत आहेत किंवा केल्या जात आहेत त्या खऱ्या आहेत की खोट्या हे आता तरी स्पष्ट होत नाही पण
ज्या संविधनामुळे आज जी मंडळी अतिशय वातानुकूलित जीवन जगत आहेत,सर्व ऐश आराम उपभोगत आहेत त्याच क्षेत्रांतून जर सवीधानास बाधा पोहचंविण्याचे प्रयत्न होत असतील तर आजच सर्वांनी जागृत होऊन एकसंघराहून अशा प्रकारांना रोखण्यासाठी एकवटले पाहिजे अन्यथा येणारा काळ आपणास माफ करणार नाही.
संपूर्ण विश्वात सर्वश्रेष्ठ अशी भारतीय लोकशाही असून ती विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळाली आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवणे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.
माणवी जीवनाच्या कल्याणासाठी तथागत गौतम बुद्धांच्या विचाराची गरज आहे. माणसाचे आयुष्य सार्थकी होण्यासाठी तथागत गौतम बुद्धांनी अतिशय महत्वाचे पंचशील दिले असून त्याचे तंतोतंत पालन केले तरच जीवनाचा खरा अर्थ कळेल व हे जीवन सार्थकी ठरेल. आजच्या युगातील तरुण युवा पिढी अनावश्यक रूढी परंपरा जोपासत स्वतःला हायटेक समजण्याच्या अनामिक हुरहूरीतून बेरोजगारी, व्यसनाधीनता याकडे वळत आहे ही बाब खूपच चिंताजनक म्हणावी लागेल.ज्या कार्यासाठी आपला माणूस म्हणून जन्म झाला त्याकडे पाहून चिंतन करण्याकडे मात्र कुणीही पुढाकार घेत नाही अपवाद म्हणून एखादी सामाजिक संस्था किंवा जेष्ठ मंडळी समोर आले तरी त्यांच्या विचारांचे अनुकरण केले जात नाही ही बाब अतिशय खेदजणक च म्हणावी लागेल.तरुण पिढी देशाचे भवीष्य आहे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना देखील अनेक अपेक्षा असतात त्यामुळे अनावश्यक रूढी परंपरा किंवा व्यसनाधीनता यात आडकुन न पडता युवा पिढीने आपल्या जिवनात तथागत गौतम बुद्धांच्या विचाराचे पालन करणे अत्यावश्यक बनले आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणुन स्वाभिमान व सन्मानाने जगण्यासाठी भारतीय राज्य घटना दिली आहे त्यामध्ये स्वातंत्र्य, बंधुत्व व समानता हे अधिकार बाबासाहेबांनी दिले आहेत त्यामुळे आज तुम्ही आम्ही सन्मानाने व सुरक्षित पने जीवन जगत आहोत .जो पर्यंत ही राज्य घटना सुरक्षित आहे साविधान आहे तो पर्यंतच आपण हे आनंदी जीवन जगू शकतो त्यामूळे सरकार कुणाची येईल, किंवा माझ्या पदरी काय पडेल या विचाराच्या मर्यादेत किंवा मोहात न पडता ज्या संविधानामुळे आपण माणूस बनलो व जीवनाचे ऐश आराम उपभोगत आहोत त्याची जाणीव ठेऊन संविधान कायम राहील यासाठी जागृत राहू हीच यावेळी सर्वांना विनंती
जय भीम जय भारत