दैनिक चालू वार्ता परतूर/प्रतिनिधी
परतूर :तालुक्यातील सोयंजना ग्रामपंचायत मध्ये २०२० पासून गावात ग्रामसभा, मासिक सभा होत नाही. शासनाने नवीन ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बांधकाम झालेले असताना एकही दिवस ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक यांनी कामकाज केलेले दिसून येत नाही. सर्व बाबीची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सोयंजना ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना गावातील विकास कमबबात विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. तसेच ग्रामसभा व मासिक सभा होत नाही. तर कामांना मंजुरी कशी दिली जाते. तसेच या ग्रा.पं. अंतर्गत झालेली काही कामे गायब असल्याचे दिसून येते. ग्रा.पं. ऑफिस नवीन इमारत बांधकाम पूर्ण दाखवले परंतु, दुसऱ्या माजल्यावरती जाण्यासाठी जिना नाही.
तसेच बेरोजगार, अपंग, विधवा यांच्यासाठी शासनाच्या निधीतून बांधलेले व्यापारी गाळे कुठे आहेत. जि.प.शाळा सोयंजना येथे पाणी फिल्टर कुठे आहे. घनकचरा व्यवस्थापन, पशुसंर्वधनासाठी बांधलेला पिण्याच्या पण्याच्या पाण्याचा हौद, पाणी पुरवठाकडून विंधन विहीर बोर किती घेतले, १४ व १५ या वित्त आयोग कुठे व कशा प्रकारे खर्च केला. सन १९९९ ते २००० या कालावधित झालेला गाव तलाव गटातून गायब झाला. ग्रामसेवक हे उत्तर देण्यास टाळाटाळ करतात. सोयंजना ग्रामपंचायतीला शासनाच्या कोणत्याही नियम व अटी लागून कामे करीत नसल्याची तक्रार निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मनमानी कारभाराला आळा बसविण्यासाठी वरिष्ठांनी कायदाचा भंग करणाऱ्या ग्रामपंचायतची चौकशी करून योग्य ती कडक कारवाई करण्याची मागणी प्रल्हाद शिवाजी ढवळे, गणेश सर्जेराव ढवळे यांनी केली आहे.