दैनिक चालु वार्ता मोखाडा : सौरभ कामडी
विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची क्रमवारी ठरवण्यासाठी निश्चित केलेल्या आरोग्य निर्देशांकाच्या मूल्यांकनात पालघर जिल्हा परीषदेचा पाचवा क्रमांक आल्यानंतर याचा बराच गवगवा होवून प्रशासनाने स्वतःची पाठ थोपटुन घेतली खरी मात्र मोखाडा तालुक्यातील कुर्लोद गावात स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही आरोग्य यंत्रणेचा मागमूसही नाही गेल्या कित्येक वर्षांपासून येथील उपकेंद्र बांधण्याचा विषय चर्चेत आहे मात्र सरकार आली बदलली तरीही येथे आरोग्य यंत्रणा उभी राहु शकलेली नसल्याने संताप व्यक्त होत असून आजघडीला येथील बांधवाना खोडाळा मोखाडा किवा थेट जव्हार येथे जावून आपले उपचार घ्यावे लागत आहेत यामुळे आरोग्यात भरारी घेणरे शासन कागदांच्या ढीगाऱ्या बाहेर येवून प्रत्यक्षात काम करणार आहे कि नाही असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.कारण आरोग्य निर्देशांकात जिल्हा ३१ वरुन ५ वर जात असेल आणि मोखाड्यातील एका दिड हजार लोकसंख्येच्या दुर्गम भागात आरोग्य यंत्रणाच उपलब्ध नसेल तर मग कोणाचे आणि कसले मूल्यांकन शासन करीत आहे हाच खरा सवाल आहे.
मोखाडा तालुक्यातील शहरापासून किमान २० ते २५ किमी अंतरावर कुर्लोद हे गांव आहे खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत हे गांव येत असले तरी खोडाळा ते कुर्लोद हे अंतरही २० किमी एवढे आहे.दिड हजारांच्य आसपास लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये कुर्लोद,पेठेपाडा,कापसीपाडा,माणीचापाडा,वडपाडा,रायपाडा,शेंड्याचापाडा, जांभूळपाडा आणि आंबेपाडा या गावपाड्यांचा समावेश आहे.आजवर याठीकाणी सर्पदंश किंवा ईतर साथीच्या आजाराने अनेकदा लोक दगावली आहेत एखाद्या मृत्यूने सर्व यंत्रणा खडबडून जागी होते तेवढ्या पुरते रेस्क्यु कॅंपच्या नावाखाली यंत्रणा उभारली जाते मात्र याची चर्चा कमी झाली कि पुन्हा स्थिती जैसे थे होते.हि परीस्थिती वर्षभराची असली तरी यातील पावसाळ्यातील स्थिती तर अतिशय भयावह असते.त्याचे कारण याच ग्रामपंचायत मधील जांभूळपाडा,रायपाडा शेड्याचापाडा आणि आंबापाडा या चार पाड्यांचा संपर्क पावसाळ्यात संपूर्णपणे तुटतो. कारण या गावांच्यामध्ये नदि आहे मात्र यावर पुल नाही.
अशावेळी येथे उपकेंद्रे , आरोग्य यंत्रणेचे असणे आवश्यक आहे मात्र असली कसलीही आरोग्य यंत्रणानसल्याने अनेकदा जीव गमावण्यावाचुन येथील नागरीकांना पर्यायच नसतो एकीकडे तालुक्यातील सातुर्ली येथे एक पुल असताना दोन पुल बांधले जात आहेत मात्र ईथे ज्यागावपाड्यांचा पावसाळ्यात ४ महिने संपर्कच तुटतो तिथे मात्र एकहि पुल बांधण्याचे औदार्य शासन दाखवत नाही.तालुक्यातील खोच आणि कुर्लोद या दोन उपकेंद्राना ६ वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली यातील खोच उपकेंद्र बनून तयारही झाले मात्र कुर्लोद येथे जागेचा विषय समोर येवून अद्याप तेथील फाईल पुढे सरकत नाही.यामुळे आजवर तालुक्यातील कोणतेही रस्ते पुल किंवा एखादी विशिष्ट गोष्ट हि एखाद्याचा बळी गेल्यानंतरच होत असल्याची आजवरची स्थिती असल्याने शासन प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी यागावातही एखादा बळी जाण्याची वाट पाहत आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.यामुळे पालघर जिल्ह्यातील शेवटच्या टोकातील प्रत्येक दारात आरोग्य यंत्रणा उभी राहील तेव्हाच खऱ्या अर्थाने आरोग्याची भरारी म्हणता येईल अन्यथा आरोग्य यंत्रणा फक्त कागदावरील नंबरावरच मोजली जाईल.
बॉक्स …..
ज्याप्रमाणे आरोग्यात जिल्ह्याची भरारी याची बातमी झाली त्याच प्रमाणे रोजगारातही पालघर जिल्हा सर्वात पुढे या आशयाची चर्चा झाली मात्र संपूर्ण जिल्ह्याचे सोडा याच कुर्लोद मधील वडपाडा पेठेपाडा हि गावपाडे रोजगारासाठी अक्षरशः ओस पडलेली असून एखाद दुसऱ्या खरात वयस्क माणस सोडली तर पोटाची खळगी भरण्यासाठी संपूर्ण गावात भयाण शांतता पसरली आहे. यामुळे सरकार कोणाचेही असो प्रशासकीय अधिकारी कोणीही असो योजना कागदावर आणि आकडेवारीत सुसाट असतात प्रत्यक्षात विदारक स्थिती भयावह असते यामुळे कुर्लोद गावातील आरोग्याचे तिनतेरा आणि रोजगाराची स्थिती पाहता पालघर जिल्हा प्रशासनाच्या कागदोपत्री प्रगतीवर मारलेली चपराक आहे.
” कुर्लोद गावात उपकेंद्र व्हावी नजीकच्या गावाचा तुटणारा संपर्क यावर मी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे एवढेच काय तर मी नुकतेच याबाबत उपोषणही केले मात्र जागेचा प्रश्न मंत्रालय स्तरावर असल्याचे सांगून ठोस कार्यवाही होत नाही या गावची स्थिती अशीच राहीली तर मी यासर्व ग्रामस्थांना घेवून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करीन कारण आमच्या आदिवासी माणसांना माणुस म्हणून जगण्याचा अधिकार स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही मिळणार नसेल तर उलगुलान जारी रहेगा.
प्रदिप वाघ
उपसभापती,पंचायत समिती मोखाडा