दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): प्रतिनिधी: काल २९ एप्रिल रोजी आलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने आष्टी(श) येथील कांदा उत्पादक शेतकरी योगेंद्र पोकळे (४२) यांचे ३ एकरातील कांदा पीक नष्ट झाले आहे याबाबत असे की,नजीकच्या मौजा पेठ अहमदपूर येथील शेतकरी विनायक धोंगडी यांचे मालकीचे ३ एकर शेत कांदा पिकासाठी पोकळे यांनी मक्त्याने केले आहे येणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून उन्हाळी कांदा पीक पेरले मात्र उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाल्याने हाती आलेले कांदा पीक रातोरात नष्ट झाल्याने त्यांचेवर आर्थिक संकट कोसळले आहे त्यामुळे संबंधित कृषी विभागाने पीक पंचनामे करून शेतकरी योगेंद्र पोकळे यांना आर्थिक मदत देण्याची आवश्यकता आहे कांदा शेती मक्त्याने केल्यामुळे मूळशेतमालकाला या अवकाळी पावसाचा फरक पडत नाही मात्र वाहीतदार शेतकऱ्याला याचा फटका मोठ्या प्रमाणात बसतो ही बाब विचारात घेऊन मदतीची मागणी करण्यात येत आहे सोबतच नजीकच्या मौंज्यात शेतकरी प्रशांत सिसट,शेख हफीज या शेतकऱ्याचे सुद्धा नुकसान झाले आहे त्यासाठी कृषी विभागाने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे