दैनिक चालु वार्ता प्रतीनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी: सजीव सृष्टीतील सर्व प्राणीमात्र वगळता मनुष्य हा विचारशील प्राणी आहे त्याला विचारशक्ती आहे तो विचाराच्या जोरावर आपले जीवन सुखी करू शकतो म्हणून त्यांना कळप न म्हणता माणसाच्या एकत्रीकरणाला गट,संघटना,पक्ष समाज अशी विविध ठिकाणी त्याची ओळख आहे त्याला वैचारिक दिशा आहे हाच मानवाचा वैचारिक वारसा घेत तालुक्यातील नागरिकांना सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून प्रश्न विचारला जातोय की स्थानिक आष्टी शहरातील मकरंद देशमुख स्थापित जनशक्ती संघटना सध्या आष्टी न.पं.मध्ये काँग्रेस सोबत युतीत आहे तर ग्रा.पं. पेठ अहमदपूर मध्ये स्वबळावर बहुमतात आहे मात्र आता सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आ.दादाराव केचे आणि भाजप पुरस्कृत नेता सुमित वानखेडे यांच्या माध्यमातून आष्टी शहराच्या विकासाचा आधार घेत भाजप पक्षाशी जवळीक साधतो आहे यापूर्वीही जनशक्ती संघटना नजीकच्या अंतोरा येथील ग्रा.पं. निवडणुकीत काँग्रेस गटाच्या विरोधात दंड थोपटले होते तर अंतोरा येथील पाणीपोईचे उद्घाटन भाजपचे सुमित वानखेडे यांच्या हस्ते घेतल्याची बातमी आहे शिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस गटाच्या विरोधात भाजप पक्षाला सोबत घेत किसान सन्मान आघाडीच्या रूपाने निवडणुक लढवली आहे यावरून जनशक्ती संघटनेचा वैचारिक आणि राजकीय अजेंडा काय?असा संभ्रमवजा प्रश्न नागरिकात चर्चिला जात आहे कोणताही राजकीय गट एका वैचारिक ध्येयाने प्रेरित असतो हा त्याचा मूळ पाया असतो पण याचे उत्तर जनशक्ती संघटनेच्या राजकीय वाटचालीने संशयास्पद भूमिकेत गेले आहे काही मतदार वैचारिक आधारावर मतदान करत असतो तर काही मतदार ज्याला आपण विकास म्हणतो(पुढारी,कर्मचारी आणि विकासक यांच्या भोवती फिरणारा शासकीय निधी) त्याला मतदान करणारा असतो या दुसऱ्या वर्गवारीतला मतदार अधिक प्रमाणात असतो पण तो फिरता मतदार असतो परंतु वैचारिक पातळीचा मतदार हा कायमस्वरूपी संघटनेला मोठा करणारा असतो एका धेय्याने झपाटलेला असतो म्हणून कोणताही राजकीय पक्ष अथवा गट कुठल्या विचारधारेवर मार्गक्रमण करतो हाच त्यातून महत्त्वाचा भाग उरतो पण याला खो देत स्थानिक जनशक्ती संघटना विकासाच्या नावावर विविध पक्षाच्या तंबूत शिरते आहे?त्यामुळे सध्या जनशक्ती संघटनेची वैचारिक दिशा काय असा प्रश्न तालुक्यातील नागरिक विचारत आहे यासाठी जनशक्ती संघटना आपली वैचारिक दिशा नागरिकापुढे ठेवतील अशी अपेक्षा करूया तूर्तास एवढेच.