दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
____________________________________
श्रीक्षेत्र माहूर: ता.०३.. तालुक्यातील कुपटी सह परिसरात मागील महिन्याच्या 25 तारखेपासून आवकळी,गारा सह सततचा पाऊस व विजांच्या गडगडाटा सह सुसाट वाऱ्याने शेतातील उन्हाळी पिकांचे सोडाच
पण घरादारावर चे टिन पत्रे उडून घरांचे भरपूर नुकसान झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचा व नागरिकांचा आवाज होऊन कुपटी येथील लोकनियुक्त सरपंच प्रफुल पाटील यांनी निवेदनाद्वारे नागरिकांना सोबत घेऊन आपल्या समस्या शासन दरबारी तहसीलदार यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचे निवेदन माहूर नगरीचे नगराध्यक्ष फिरोजभय्या दोसानी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिले.
प्रामुख्याने आज शेतकऱ्यांच्या शेतिसह घरांचे नुकसान होऊन अनेक दिवस झाले तरी शासन दरबारातून कुठल्याही प्रकारची हालचाल दिसत नसल्याचे जाणवले.म्हणून नुकसानग्रस्त व पीडित शेतकऱ्यात शासनाप्रती सांक्षता येत आहे. त्यामुळे आता घरी बसून चालणार नाही तर आपला हक्क आपल्याला मिळवलाच पाहिजे या भावनेने कुपटीचे सरपंच प्रफुल पाटील यांनी नागरिकांना सोबत घेऊन आपल्या मागण्यांसह चे निवेदन माहूर तालुक्याचे तहसीलदार किशोर यादव यांना गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या व युवकांच्या उपस्थितीत दिले…
यावेळी पवन बुरकुले,
श्री. बाबाराव पाटील भुसारे
श्री.बबनराव जाधव, किरण राठोड,दत्ता चव्हाण, हनुमान आसोले, गजानन पांडे,ओम पाटील भुसारे, कैलास राठोड, सुरेश भुसारे, गजानन पांडे, कुणाल भुसारे, शुभम कुर्मे, कुणाल कोथळे,विकास भुसारे, रवी भुसारे,देवराव माळकर, व तसेच असंख्य युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…..