दैनिक चालु वार्ता उपसंपादक जिल्हा उस्मानाबाद-नवनाथ यादव
भू म/उस्मानाबाद :- शहरातील वाहनांची संख्या खूप मोठया प्रमाणात वाढत असल्यामुळे वाहतूक कोंडी ची समस्या निर्माण होत आहे. औद्योगिक शहरांमध्ये जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी पाहण्यास मिळते.भूम तालुक्यातील आष्टा गावचे भूमिपुत्र,स्टार्टअप प्रदीप गिलबिले यांनी पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक उपाय शोधला असून त्यांनी स्मार्ट सिग्नल प्रणाली विकसित केली आहे.पुणे जिल्ह्यात आयटी कंपन्यांची संख्या मोठी आहे. यामुळे या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना, नागरिकांना वाहतूक कोंडीचा नेहमी सामना करावा लागतो. चौक -चौकात सिग्नलच स्मार्ट झाले असुन वाकड चौकात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट इंटेलिजंट सिग्नल सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. ही सिस्टीम कॅमेरा आणि सर्व्हेर नियंत्रित करते. ज्या लेनवर गाड्यांची संख्या अधिक आहे ते सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व्हरला कळवले जाते. त्यानंतर सर्व्हेर सिग्नलचा कालावधी त्यानुसार बदलतो.अत्याधुनिक प्रणालीमुळे औद्योगिक शहरातील वाहतूक कोंडी चा गंभीर प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.त्यांनी केलेले विकसित प्रणालीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.