दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: दिनांक 4 मे 2023 रोजी देगलूर तालुक्यातील खुतमापूर गावातील ही दुर्दैवी घटना लोंबकळणाऱ्या विद्युत तारेला चिटकून . सुरेश गोविंद बडगे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे बडगे यांचा बळी गेला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
वय ५० वर्षीय
शेतकऱ्याचा मृत्यू
झाल्याची घटना
देगलूर घडली
खुतमापूर परिसरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी वाऱ्यामुळे अनेक विद्युत पोल खाली पडले येथील शेतकरी सुरेश गोविंद बडगे (५० वर्ष ) हे गुरुवारी (दि.४) सकाळी लवकर उठून शेतात जात होते. वाटेतच विद्युत तार लोंबकळलेली होती, या तारेचा स्पर्श होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
महावितरणचे अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मयताचे नातेवाईक व गावकऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण पसरले होते. आ. जितेश अंतापूरकर, तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रीतम देशमुख, पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, बिट जमादारअहमद बारी, नारायण यंगाले आदींनी नातेवाईकांची समजूत काढली त्यामुळे तणाव निवळला.
बुधवारी सायंकाळी लाईनमन व मृत सुरेश बडगे या दोघांनी ११ केव्ही पोलजवळील झाडे तोडून विद्युत पुरवठा बंद केला होता; परंतु मध्यरात्री विद्युत पुरवठा केव्हा सुरू झाला याचा अंदाज बडगे यांना आला नाही. लोंबकळत असलेल्या तारेचा स्पर्श त्यांच्या डोक्याला झाल्याने त्यांना प्राण गमवावालागला. मरखेल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे आमच्या गावातील सुरेश गोविंद बडगे यांचा लोंबकाळणाऱ्या विद्युत तारेचा डोक्याला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला आहे. आम्ही वारंवार लोंबकाळणाऱ्या तारा दुरुस्त करण्याची मागणी केली होती. याकडे त्यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप सामजिक कार्यकर्ते बालाजी पाटील इंगळे यांनी केला.